शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
5
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
6
हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
7
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
8
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
9
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
10
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
11
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
12
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
13
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
14
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
15
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
16
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
17
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
18
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
19
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
20
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
Daily Top 2Weekly Top 5

नारळ विक्रेत्यांना सुगीचे दिवस

By admin | Updated: November 24, 2014 23:14 IST

जिल्ह्यातील यात्रांना प्रारंभ : बाजारपेठेत वाढली मागणी

सातारा : कुठलंही शुभकार्य नारळाशिवाय पार पडत नाही. वर्षभर मोठा खप असणाऱ्या या फळाला गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मागणी वाढल्याने नारळ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
सध्या यात्रेचा हंगाम धडाक्यात सुरु झाल्याने नारळाला आणखी मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ८00 शेकडा दराने विकले जाणारे नारळ आता १000 रुपये शेकडा या दराच्या घरात गेले आहेत. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुक याच वर्षात आल्याने नारळाचा विक्रमी खप झाला आहे. इतर फळांच्या तुलनेत ही विक्री खचितच मोठी ठरली आहे.
निवडणुकीआधी विकासकामांची उदघाटने तसेच भूमिपुजने झाली. यासाठी नारळ मोठ्या प्रमाणात खपला गेला. तुळशी बारसनंतर लग्नाचे मुहूर्तही सुरु झाले आहेत. लग्नाच्या विधीत नारळ आवश्यक असतो. त्यामुळे नारळाला मागणी वाढली आहे.
जिल्ह्यातील यात्रांचा हंंगामही सुरु झाला आहे. देवतांच्या यात्रांमध्ये होणाऱ्या छबिन्यात गुलाल आणि नारळाला मागणी असते.
सातारा येथील मंडई परिसरात केरळ राज्यातून तसेच आपल्या कोकणातूनही मोठ्या प्रमाणावर नारळ दाखल होत असतो. मात्र, वाहतूक खर्च लक्षात घेता कोकणातला नारळ विक्रीला परवडतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)


सातारा येथील बाजारपेठेत दाखल झालेले नारळ बॅगांमध्ये भरताना व्यापाऱ्यांचे कर्मचारी.

निवडणुकीचा फायदा
तसं पाहिलं तर नारळ हे वर्षभर मागणी असणारे फळ. मात्र, यंदा लोकसभा, विधानसभा निवडणुका एकापाठोपाठ एक आल्याने नारळाला मागणी वाढली होती. निवडणुकीचा फायदा नारळ विक्रेत्यांना झाला होता. आता पुन्हा यात्रांमुळे मागणी वाढली आहे.


बाजारपेठेत नारळ मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. नारळाचा विविध कारणांसाठी वापर होत असल्याने या फळाला वर्षभर मागणी असते. नारळाचे दर वाढले तरी यात्रा काळात मागणी वाढतच असते.
- राजेंदसिंह रजपूत