शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसाठी संपादित जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST

मसूर : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळे खराडे येथील पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाईनच्या कामासाठी जात असलेल्या प्रकल्पबाधीत ...

मसूर : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळे खराडे येथील पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाईनच्या कामासाठी जात असलेल्या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला यश आले. जमिनीची मोजणी पूर्ण होऊन भूसंपादन झाल्याने मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे खराडेतील शेतकऱ्यांनी श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, विकास थोरात यांचे कौतुक केले.

खराडे येथील शेतकऱ्यांनी भूसंपादन होत नाही तोपर्यंत कोणतेही इलेक्ट्रिक लाईनचे काम मुरुमाचा भरावा, बांधकाम या गोष्टी करावयाच्या नाहीत, असा आक्रमक पवित्रा घेतला.

पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाईनचे काम बंद पाडले होते. या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रश्न खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांच्या सहकाऱ्याने तारगावचे विकास थोरात व कऱ्हाड, कोरेगाव, सातारा, खंडाळा तालुक्यातील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकरी यांचा माध्यमातून भूसंपादन मोबदला व रेल्वेच्या इतर सुविधांसाठी न्यायिक लढा सुरू आहे. यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे भूसंपादन प्रस्ताव तयार झाले असून, मोबदल्याचे पैसेही महसूलकडे आले आहेत. अजून काही रेल्वे लगतच्या गावातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव महसूल प्रशासनाच्या व भूमी अभिलेखच्या माध्यमातून तयार करणे सुरू आहे. परंतु रेल्वे विभागाच्या चुकीच्या रेकॉर्डमुळे बऱ्याचवेळा याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खराडेच्या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला होता.

आता झालेल्या मोजणीत पूर्वी आणि सद्यस्थितीतील रेल्वे लाईनला संपादित होणारे सर्व गट सामाविष्ट करण्यात आले. गावातील कवठे हद्द ते बेलवाडी हद्दीपर्यंतच्या सर्व गटांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. खराडेच्या भूसंपादन प्रक्रियासाठी खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांच्या माध्यमातून विकास थोरात यांनी प्रयत्न केले. गावामध्ये रेल्वेने सतरा ते अठरा फूट रस्त्यासह संपादन केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय हद्दीतून ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये रस्त्याच्या बाबतीत भविष्यातील होणारे तंटे आपोआप सुटणार आहेत.

मोजणीवेळी विकास थोरात, रेल्वे अधिकारी बलवंत कुमार सिंग, मोजणी अधिकारी धसाडे, तलाठी जयसिंग जाधव, अविनाश जाधव, हणमंतराव जाधव, प्रकाश जाधव उपस्थित होते.

कोट

खराडेत रेल्वेसाठी गेलेल्या जमिनीसंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असलेली जमीन रेल्वे प्रकल्पात जाऊनही त्यांना योग्य न्याय मिळत नव्हता, तो मिळवून दिला.

- हणमंतराव जाधव,

शेतकरी खराडे