शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

सातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक ...

सातारा : शासनाने राज्याचा अधिकाधिक विकास करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असून जिल्ह्याच्या समातोल विकासावर भर राहणार आहे, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांड बाळासाहेब आलदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

अख्ख जग कोविड १९ च्या विळख्यात अडकलं होतं. आता विळखा थोडा सैल झालाय, पण धोका अजून संपलेला नाही पण मागच्या सात आठ महिन्यात शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय, लोकांनी दाखवलेला संयम आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातले अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचं कौतुक केले.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना गोपनीय क्षेत्रात, गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांचे असाधारण आसूचना कुशलता पदक देऊन गौरव केला आहे. त्याचबरोबर पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनाही राष्ट्रीय सुधार सेवा पदक व प्रमाणपत्र, गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा कोविड वॉरियर्स म्हणून गौरव करण्यात आला.

कलापथकाद्वारे कोरोना संसर्गाविषयी जनजागृती

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आठवडी बाजारांमध्ये कलापथकाद्वारे कोरोना संसर्गाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लोककलारंग संस्थेमार्फत कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली. जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य असून यातून कोरोना संसर्गा विषयी ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.