शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: राष्ट्रवादीचे 'घड्याळ', कोणाला करणार 'घायाळ?'; उंडाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

By प्रमोद सुकरे | Updated: April 22, 2025 20:37 IST

कऱ्हाड: दोन दिवसांपूर्वी कराडात राजकीय पक्षप्रवेशाचा एक जंगी कार्यक्रम झाला. काँग्रेसची सुमारे ५० वर्षाची परंपरा असणाऱ्या 'उंडाळकर' परिवारातील अँड. ...

कऱ्हाड: दोन दिवसांपूर्वी कराडात राजकीय पक्षप्रवेशाचा एक जंगी कार्यक्रम झाला. काँग्रेसची सुमारे ५० वर्षाची परंपरा असणाऱ्या 'उंडाळकर' परिवारातील अँड. उदयसिंह पाटील यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत हातात 'घड्याळ' बांधले. पण आता हे राष्ट्रवादीचे 'घड्याळ' दक्षिणच्या राजकारणात नक्की कोणाला 'घायाळ' करणार? याबाबतच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. खरंतर काल-परवापर्यंत जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या कराड दक्षिण मतदार संघात आता बदल घडू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे डॉ. अतुल भोसलेंनी परिवर्तनाचे 'कमळ' फुलवले. त्याला काही महिने लोटताहेत तोच काँग्रेसची परंपरा जोपासणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील यांचे पुत्र एड. उदयसिंह पाटील यांनी काँग्रेसला हात करत आता त्याच हातात घड्याळ बांधले आहे. त्यामुळे कराड दक्षिणच्या आणि कराड तालुक्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम होणार हे निश्चित!

काँग्रेसला किती बसेल झळकराड दक्षिण काँग्रेसचे नेतृत्व सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करीत आहेत. पण त्यांच्या सोबतच असणाऱ्या एड. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. मुळातच भाजपने येथे 'कमळ' फुलवल्याने पाठीमागे पडलेल्या काँग्रेसचे पाय आणखी खोलात गेले आहेत असेच सध्या तरी म्हणावे लागेल. 

भाजपला कशी बसेल झळराज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे सध्या डॉ.अतुल भोसलेंची गाडी सुसाट आहे.आता महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एड. उदयसिंह पाटील यांनी प्रवेश केल्याने याचा फायदा सहाजिकच त्यांना होणार आहे. विकास कामे, कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावणे उंडाळकरांना सुलभ होणार आहे.त्याचबरोबर डॉ. अतुल भोसले यांच्या विजयानंतर सैरभैर झालेले काँग्रेस कार्यकर्ते भाजपकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होते. त्यांना उदयसिंह पाटलांच्या प्रवेशामुळे सत्तेजवळ जाण्याचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे असेही मानले जाते आहे. 

अखेर पवारांनी इच्छा पूर्ण केलीच! राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच विलासराव पाटील- उंडाळकर यांनी राष्ट्रवादीत यावे अशी पवारांची इच्छा होती. पण त्याला यश आले नाही. त्यानंतर २०१४ साली विलासराव पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. तेव्हा देखील अजित पवारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेण्याचा आग्रह केला होता. पण त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान 'धाकल्या' पवारांनी विलासराव पाटील यांच्या एका 'पुतण्या'ला पक्षात घेतले. पण त्यांनी उंडाळकरांचा पिच्छा सोडला नव्हता. अखेर उदयसिंह पाटलांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत घेत नुकतीच आपली इच्छा पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हा अभ्यासाचा विषय आहे 'कराड दक्षिण'चे नेतृत्व आजवर दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील व त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घकाळ केले आहे.अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हा जिल्हा राष्ट्रवादीचा 'बालेकिल्ला' झाला पण कराड दक्षिणचा 'बुरूज' त्यांच्या हाती लागला नाही. किंबहुना विलासराव पाटलांनी तो त्यांच्या हाती लागू दिला नाही. पण त्यांच्याच वारसदाराला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची गरज का वाटली असावी? हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे बरं!

म्हणून निर्णय घ्यावा लागला ..खरंतर पक्षप्रवेशाचा निर्णय घेणे एवढे सोपे नव्हते. पण राजकीय स्थित्यंतरे पाहता काहीतरी निर्णय घ्यावा असा कार्यकर्त्यांचा रेटा होता. म्हणूनच दिवंगत विलासराव पाटलांनी जी विचारधारा जपली त्याच्याशी मिळती जुळती विचारसरणी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला असे मत अँड. उदयसिंह पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान मांडले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाcongressकाँग्रेस