शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

राजकीय सत्ताधाºयांपेक्षाही ‘सीईओं’ची खुर्ची अस्थिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:46 IST

सागर गुजर।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची खुर्ची अस्थिर असल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र, या राजकीय पदांपेक्षाही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हे प्रशासकीय प्रमुख पद अस्थिर ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत पाच अधिकाºयांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे.राजकीय संगीत खुर्चीचा प्रकार ...

सागर गुजर।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची खुर्ची अस्थिर असल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र, या राजकीय पदांपेक्षाही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हे प्रशासकीय प्रमुख पद अस्थिर ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत पाच अधिकाºयांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे.राजकीय संगीत खुर्चीचा प्रकार नेहमीच चर्चेत असतो. किंबहुना खुर्च्यांची ओढाओढ करण्याचे काम विरोधकांसह सत्ताधाºयांचे पक्षांतर्गत विरोधकही नेहमी करत असतात. ही राजकीय वर्तुळातील परिस्थिती आता प्रशासकीय कारभारातही निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागाला विकासाचा चेहरा देण्याचे काम जिल्हा परिषद करीत असते. सुदैवाने जिल्हा परिषदेला अभ्यासू मुख्य कार्यकारी कार्यकारी मिळाल्याने विविध पातळ्यांवर जिल्हा परिषदेने आपली घोडदौड सुरू ठेवली. स्वच्छता, पाणीपुरवठा, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घरे, झिरो पेंडन्सी या कामांच्या बाबतीत सातारा नेहमी राज्यात अग्रेसर राहिला आहे. देशपातळीवरही विविध पुरस्कार मिळाल्याने सातारा देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकला आहे.ही परिस्थिती एका बाजूला असली तरी जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असणाºया मुख्य कार्यकारी अधिकाºयांना काम करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याचे चित्र आहे. मंत्रालयातील ज्या अधिकाºयाला ‘आएएस’पदी बढती मिळते, अशी मंडळी पहिल्यांदा साताºयात पाठविली जातात. साताºयात अनेक मोहिमांना लोकसहभाग चांगला मिळतो. राजकीय व प्रशासकीय पातळीवरूनही चांगली साथ मिळत असल्याने काम उठावदार होते. त्यातच डॉ. राजेश देशमुख यांच्यासारखे अधिकारी असतील तर आपोआपच इतर अधिकाºयांनाही प्रोत्साहन मिळून एका उंचीवर कामे के ली जातात. ही उंची गाठली जात असतानाच डॉ. देशमुख यांची १४ महिन्यांतच बदली झाली.जिल्हा परिषदेचा १९६२ ते २0१७ या ५५ वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास केल्यास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता यांना २ मे १९९९ ते १0 आॅक्टोबर १९९९ असा सर्वात कमी म्हणजे अवघे ५ महिने काम करण्याची संधी मिळाली. एस. डी. चौगुले यांना सर्वात जास्त म्हणजे १0 आॅक्टोबर १९८३ ते २३ जून १९८७ या चार वर्षांच्या कालावधीत काम करण्याची संधी मिळाली. २0१२ ते २0१७ या पाच वर्षांच्या कालावधीत अभिजीत बांगर, जी. श्रीकांत, नितीन पाटील, डॉ. राजेश देशमुख या चार अधिकाºयांची बदली झाली आहे. सरकार बदलले की प्रमुख अधिकाºयांच्याही बदल्या केल्या जातात, असा पूर्वइतिहास असल्याने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे हेही दोन वर्षांपेक्षा जास्त काळ साताºयात राहू शकतील का? हा प्रश्न आहे. कारण येत्या दोन वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. साहजिकच कैलास शिंदे हे तरी किती काळ राहतील, हा प्रश्न आहे.५५ वर्षांत २९ अधिकाºयांनीपाहिला कार्यभार...वरिष्ठ अधिकाºयांच्या तीन वर्षांनंतर बदल्या होत असतात. साहजिकच जिल्हा परिषदेच्या ५५ वर्षांच्या इतिहासात १८ मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कार्यभार सांभाळायला हवा होता. परंतु, याजागी तब्बल २९ मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी हे काम पाहिले.नवीन सीईओंपुढे आव्हान...गेल्या १४ महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाने भलताच वेग धरला होता. हा वेग कायम ठेवण्याचे मोठे आव्हान नवीन सीईओ कैलास शिंदे यांच्यापुढे असणार आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.३१) सायंकाळी ४ वाजता जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मावळते सीईओ डॉ. राजेश देशमुख यांचा निरोप समारंभ होणार आहे.