शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

राजकीय सत्ताधाºयांपेक्षाही ‘सीईओं’ची खुर्ची अस्थिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:46 IST

सागर गुजर।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची खुर्ची अस्थिर असल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र, या राजकीय पदांपेक्षाही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हे प्रशासकीय प्रमुख पद अस्थिर ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत पाच अधिकाºयांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे.राजकीय संगीत खुर्चीचा प्रकार ...

सागर गुजर।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची खुर्ची अस्थिर असल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र, या राजकीय पदांपेक्षाही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हे प्रशासकीय प्रमुख पद अस्थिर ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत पाच अधिकाºयांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे.राजकीय संगीत खुर्चीचा प्रकार नेहमीच चर्चेत असतो. किंबहुना खुर्च्यांची ओढाओढ करण्याचे काम विरोधकांसह सत्ताधाºयांचे पक्षांतर्गत विरोधकही नेहमी करत असतात. ही राजकीय वर्तुळातील परिस्थिती आता प्रशासकीय कारभारातही निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागाला विकासाचा चेहरा देण्याचे काम जिल्हा परिषद करीत असते. सुदैवाने जिल्हा परिषदेला अभ्यासू मुख्य कार्यकारी कार्यकारी मिळाल्याने विविध पातळ्यांवर जिल्हा परिषदेने आपली घोडदौड सुरू ठेवली. स्वच्छता, पाणीपुरवठा, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घरे, झिरो पेंडन्सी या कामांच्या बाबतीत सातारा नेहमी राज्यात अग्रेसर राहिला आहे. देशपातळीवरही विविध पुरस्कार मिळाल्याने सातारा देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकला आहे.ही परिस्थिती एका बाजूला असली तरी जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असणाºया मुख्य कार्यकारी अधिकाºयांना काम करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याचे चित्र आहे. मंत्रालयातील ज्या अधिकाºयाला ‘आएएस’पदी बढती मिळते, अशी मंडळी पहिल्यांदा साताºयात पाठविली जातात. साताºयात अनेक मोहिमांना लोकसहभाग चांगला मिळतो. राजकीय व प्रशासकीय पातळीवरूनही चांगली साथ मिळत असल्याने काम उठावदार होते. त्यातच डॉ. राजेश देशमुख यांच्यासारखे अधिकारी असतील तर आपोआपच इतर अधिकाºयांनाही प्रोत्साहन मिळून एका उंचीवर कामे के ली जातात. ही उंची गाठली जात असतानाच डॉ. देशमुख यांची १४ महिन्यांतच बदली झाली.जिल्हा परिषदेचा १९६२ ते २0१७ या ५५ वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास केल्यास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता यांना २ मे १९९९ ते १0 आॅक्टोबर १९९९ असा सर्वात कमी म्हणजे अवघे ५ महिने काम करण्याची संधी मिळाली. एस. डी. चौगुले यांना सर्वात जास्त म्हणजे १0 आॅक्टोबर १९८३ ते २३ जून १९८७ या चार वर्षांच्या कालावधीत काम करण्याची संधी मिळाली. २0१२ ते २0१७ या पाच वर्षांच्या कालावधीत अभिजीत बांगर, जी. श्रीकांत, नितीन पाटील, डॉ. राजेश देशमुख या चार अधिकाºयांची बदली झाली आहे. सरकार बदलले की प्रमुख अधिकाºयांच्याही बदल्या केल्या जातात, असा पूर्वइतिहास असल्याने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे हेही दोन वर्षांपेक्षा जास्त काळ साताºयात राहू शकतील का? हा प्रश्न आहे. कारण येत्या दोन वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. साहजिकच कैलास शिंदे हे तरी किती काळ राहतील, हा प्रश्न आहे.५५ वर्षांत २९ अधिकाºयांनीपाहिला कार्यभार...वरिष्ठ अधिकाºयांच्या तीन वर्षांनंतर बदल्या होत असतात. साहजिकच जिल्हा परिषदेच्या ५५ वर्षांच्या इतिहासात १८ मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कार्यभार सांभाळायला हवा होता. परंतु, याजागी तब्बल २९ मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी हे काम पाहिले.नवीन सीईओंपुढे आव्हान...गेल्या १४ महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाने भलताच वेग धरला होता. हा वेग कायम ठेवण्याचे मोठे आव्हान नवीन सीईओ कैलास शिंदे यांच्यापुढे असणार आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.३१) सायंकाळी ४ वाजता जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मावळते सीईओ डॉ. राजेश देशमुख यांचा निरोप समारंभ होणार आहे.