शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

महापुरुषांना जातीच्या भिंती : निरंजन फरांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

लोणंद : समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या महापुरुषांना जातीच्या भिंतीत अडकविणे हे पाप असून, ते समाजाच्या अधोगतीचे ...

लोणंद : समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या महापुरुषांना जातीच्या भिंतीत अडकविणे हे पाप असून, ते समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे, असे प्रतिपादन प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.

लोणंद येथे आयोजित केलेल्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयंती उत्सव समितीचे प्रमुख अजित क्षीरसागर होते. तर ज्येष्ठ मार्गदर्शक एन. डी. क्षीरसागर, उत्सव समितीचे संस्थापक अजित महादेव क्षीरसागर, भाजपा युवा मोर्चाचे लोणंद शहराध्यक्ष जयेश कुदळे यांची उपस्थिती होती. लोणंदमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याचे हे १४ वे वर्ष होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

प्रा. फरांदे म्हणाले, सर्वच धर्मांनी कमी-अधिक प्रमाणात स्त्रीवर लादलेल्या दुय्यमतेचा विचार केला तर सावित्रीच्या कार्याचे महत्त्व आपल्या लक्षात येते. सावित्रीबाईंनी १९ व्या शतकात भारतीय स्त्री जीवनाच्या दिशाच बदलण्याचे ऐतिहासिक कार्य केले. अबला, अनाथ बालके, विधवा, वंचित समाज या सर्वांना पोटाशी धरणाऱ्या सावित्रीबाईंच्या कार्यामुळे आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करताना आपण पाहत आहोत. त्यांच्या या कार्याबद्दल आपण कृतज्ञ आहे.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रदीप क्षीरसागर, नामदेव क्षीरसागर, समता परिषदेचे खंडाळा तालुकाध्यक्ष महादेव क्षीरसागर, संजय माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर व कार्यकर्ते उपस्थित होते.