शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

Satara Flood: तांबवे पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:23 AM

गेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे (ता. कराड ) येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे.

ठळक मुद्देगेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे.पिलर कमकुवत झाल्याने पंधरा दिवसांपासून तो प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता. बांधकाम विभागाने संबंधित पुलाची पावसाळ्यापुर्वी तपासणीच केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

तांबवे - गेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे (ता. कराड) येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे. पुलाचे पिलर कमकुवत झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तो प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे अनर्थ टळला. 

कोयना नदीला यावर्षी  महापूर आल्याने याची झळ गावाला बसली आहे. यातच भर की काय म्हणून गेली अनेक वर्षे कोयना नदीवर खंभीरपणे उभा राहून प्रत्येक पुराशी दोन हात करणारा तांबवेचा जुना पूल अखेर बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळला.  या पुलाच्या पिलरमध्ये भेगा पडून ते धोकादायक झाला होता. त्यामुळे पूल पडण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या पंधरा दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. कोयना नदीला आलेल्या महापुराचा तांबवे गावाभोवती गेली पाच दिवस विळखा पडला होता. यातून गाव सावरत  होते त्यातच पूल कोसळण्याची घटना घडली.

पुलाच्या पश्चिमेकडील पहिल्या व दुसऱ्या पिलरचे बांधकाम सुटल्याचे समोर आले आहे. तब्बल ३८ वर्षे जुन्या असणाऱ्या या पुलाचा पिलर पावसाळाभर तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ पाण्यातच असतो. बांधकाम विभागाने संबंधित पुलाची पावसाळ्यापुर्वी तपासणीच केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरम्यान पुलाच्या जवळ  कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. त्याचे पाणी आदळून वेगाने वाहते व पुलाजवळ उतार असल्याने पाण्याचा वेग जास्त असतो. त्या पुलावरुन वाहतूक सुरुच असल्याने पुल वाहुन दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता.

तांबवे गावाला १९८० पूर्वी पूलच नव्हता. गावच्या चारी बाजुने पाणी असल्याने त्यावेळी गावची अवस्था बेटासारखी होती. त्यानंतर १९८१ साली कोयना नदीवर पूल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत ए. आर. अंतुले यांनी त्या पुलाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर तो पूल या परिसरातील १२ गावे आणि वाड्या वस्त्यावरील लोकांची चांगली सोय होवून ती गावे तालुक्याशी जोडली गेली. त्या पुलावरुन दुचाकीसह अवजड वाहनांचीही वाहतूक सुरु असते. त्यातच पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यावर या पुलावरुन पाणीही वाहते. त्यामुळे या पुलाच्या भक्कमतेची शंका ग्रामस्थांना होती. 24 जुलै रोजी निलेश भोसले यांनी या पुलाच्या   पिलरचे छायाचित्र काढले होते. त्यात पुलाच्या पिलरचे बांधकाम ढिसाळ झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर प्रशासनाने हा पूल वाहतूकीसाठी बंद केला होता. तसेच गेली आठ दिवस हा पूल महापुराच्या पाण्यात गेला होता. तीनच दिवसांपुर्वी या पुलावरील पाणी खाली गेले त्यावेळी पुलाची दुर्दशा झाली होती. काही अँगल वाहत गेले होते. मोठ्या भेगा पडल्या होत्या. पुलावर मोठे खड्डे पडले होते. तर आज पहाटे पूल कोसळला आहे.  

टॅग्स :Satara Floodसातारा पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसSatara areaसातारा परिसर