शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

Satara Flood: तांबवे पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 10:26 IST

गेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे (ता. कराड ) येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे.

ठळक मुद्देगेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे.पिलर कमकुवत झाल्याने पंधरा दिवसांपासून तो प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता. बांधकाम विभागाने संबंधित पुलाची पावसाळ्यापुर्वी तपासणीच केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

तांबवे - गेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे (ता. कराड) येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे. पुलाचे पिलर कमकुवत झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तो प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे अनर्थ टळला. 

कोयना नदीला यावर्षी  महापूर आल्याने याची झळ गावाला बसली आहे. यातच भर की काय म्हणून गेली अनेक वर्षे कोयना नदीवर खंभीरपणे उभा राहून प्रत्येक पुराशी दोन हात करणारा तांबवेचा जुना पूल अखेर बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळला.  या पुलाच्या पिलरमध्ये भेगा पडून ते धोकादायक झाला होता. त्यामुळे पूल पडण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या पंधरा दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. कोयना नदीला आलेल्या महापुराचा तांबवे गावाभोवती गेली पाच दिवस विळखा पडला होता. यातून गाव सावरत  होते त्यातच पूल कोसळण्याची घटना घडली.

पुलाच्या पश्चिमेकडील पहिल्या व दुसऱ्या पिलरचे बांधकाम सुटल्याचे समोर आले आहे. तब्बल ३८ वर्षे जुन्या असणाऱ्या या पुलाचा पिलर पावसाळाभर तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ पाण्यातच असतो. बांधकाम विभागाने संबंधित पुलाची पावसाळ्यापुर्वी तपासणीच केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरम्यान पुलाच्या जवळ  कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. त्याचे पाणी आदळून वेगाने वाहते व पुलाजवळ उतार असल्याने पाण्याचा वेग जास्त असतो. त्या पुलावरुन वाहतूक सुरुच असल्याने पुल वाहुन दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता.

तांबवे गावाला १९८० पूर्वी पूलच नव्हता. गावच्या चारी बाजुने पाणी असल्याने त्यावेळी गावची अवस्था बेटासारखी होती. त्यानंतर १९८१ साली कोयना नदीवर पूल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत ए. आर. अंतुले यांनी त्या पुलाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर तो पूल या परिसरातील १२ गावे आणि वाड्या वस्त्यावरील लोकांची चांगली सोय होवून ती गावे तालुक्याशी जोडली गेली. त्या पुलावरुन दुचाकीसह अवजड वाहनांचीही वाहतूक सुरु असते. त्यातच पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यावर या पुलावरुन पाणीही वाहते. त्यामुळे या पुलाच्या भक्कमतेची शंका ग्रामस्थांना होती. 24 जुलै रोजी निलेश भोसले यांनी या पुलाच्या   पिलरचे छायाचित्र काढले होते. त्यात पुलाच्या पिलरचे बांधकाम ढिसाळ झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर प्रशासनाने हा पूल वाहतूकीसाठी बंद केला होता. तसेच गेली आठ दिवस हा पूल महापुराच्या पाण्यात गेला होता. तीनच दिवसांपुर्वी या पुलावरील पाणी खाली गेले त्यावेळी पुलाची दुर्दशा झाली होती. काही अँगल वाहत गेले होते. मोठ्या भेगा पडल्या होत्या. पुलावर मोठे खड्डे पडले होते. तर आज पहाटे पूल कोसळला आहे.  

टॅग्स :Satara Floodसातारा पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसSatara areaसातारा परिसर