शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Satara Flood: तांबवे पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 10:26 IST

गेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे (ता. कराड ) येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे.

ठळक मुद्देगेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे.पिलर कमकुवत झाल्याने पंधरा दिवसांपासून तो प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता. बांधकाम विभागाने संबंधित पुलाची पावसाळ्यापुर्वी तपासणीच केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

तांबवे - गेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे (ता. कराड) येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे. पुलाचे पिलर कमकुवत झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तो प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे अनर्थ टळला. 

कोयना नदीला यावर्षी  महापूर आल्याने याची झळ गावाला बसली आहे. यातच भर की काय म्हणून गेली अनेक वर्षे कोयना नदीवर खंभीरपणे उभा राहून प्रत्येक पुराशी दोन हात करणारा तांबवेचा जुना पूल अखेर बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळला.  या पुलाच्या पिलरमध्ये भेगा पडून ते धोकादायक झाला होता. त्यामुळे पूल पडण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या पंधरा दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. कोयना नदीला आलेल्या महापुराचा तांबवे गावाभोवती गेली पाच दिवस विळखा पडला होता. यातून गाव सावरत  होते त्यातच पूल कोसळण्याची घटना घडली.

पुलाच्या पश्चिमेकडील पहिल्या व दुसऱ्या पिलरचे बांधकाम सुटल्याचे समोर आले आहे. तब्बल ३८ वर्षे जुन्या असणाऱ्या या पुलाचा पिलर पावसाळाभर तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ पाण्यातच असतो. बांधकाम विभागाने संबंधित पुलाची पावसाळ्यापुर्वी तपासणीच केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरम्यान पुलाच्या जवळ  कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. त्याचे पाणी आदळून वेगाने वाहते व पुलाजवळ उतार असल्याने पाण्याचा वेग जास्त असतो. त्या पुलावरुन वाहतूक सुरुच असल्याने पुल वाहुन दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता.

तांबवे गावाला १९८० पूर्वी पूलच नव्हता. गावच्या चारी बाजुने पाणी असल्याने त्यावेळी गावची अवस्था बेटासारखी होती. त्यानंतर १९८१ साली कोयना नदीवर पूल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत ए. आर. अंतुले यांनी त्या पुलाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर तो पूल या परिसरातील १२ गावे आणि वाड्या वस्त्यावरील लोकांची चांगली सोय होवून ती गावे तालुक्याशी जोडली गेली. त्या पुलावरुन दुचाकीसह अवजड वाहनांचीही वाहतूक सुरु असते. त्यातच पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यावर या पुलावरुन पाणीही वाहते. त्यामुळे या पुलाच्या भक्कमतेची शंका ग्रामस्थांना होती. 24 जुलै रोजी निलेश भोसले यांनी या पुलाच्या   पिलरचे छायाचित्र काढले होते. त्यात पुलाच्या पिलरचे बांधकाम ढिसाळ झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर प्रशासनाने हा पूल वाहतूकीसाठी बंद केला होता. तसेच गेली आठ दिवस हा पूल महापुराच्या पाण्यात गेला होता. तीनच दिवसांपुर्वी या पुलावरील पाणी खाली गेले त्यावेळी पुलाची दुर्दशा झाली होती. काही अँगल वाहत गेले होते. मोठ्या भेगा पडल्या होत्या. पुलावर मोठे खड्डे पडले होते. तर आज पहाटे पूल कोसळला आहे.  

टॅग्स :Satara Floodसातारा पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसSatara areaसातारा परिसर