शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बोअरचं पाणी जरा जपून!

By admin | Updated: October 16, 2014 22:52 IST

पुनर्भरण योजना : उद्देश चांगला; मात्र काळजी न घेतल्यास धोका

वाठार स्टेशन : स्वच्छ व निर्जंतुक पाणी देऊन एका बाजूने भविष्याची काळजी घेताना दुसऱ्या बाजूने बोअरवेल परिसरात तुंबलेल्या गटारातील पाणी बोअरवेल पुनर्भरण योजनेतून आता ग्रामस्थांना प्यावे लागणार आहे. या योजनेचा उद्देश जरी चांगला असला, तरी योग्य काळजी न घेतल््यास हे ‘विकतचं दुखणं’ ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सध्या कोरेगाव तालुक्यात ग्रामपंचायत हद्दीतील बोअरवेलचे पुनर्भरण करण्याचे काम सुरू आहे. एका गावासाठी ८४ हजार ११५ रुपयांची मंजुरी असून, बोअरवेलशेजारी अंदाजे पाच फुटांवर जमिनीत पाच इंची उभे बोअरवेल ६५ ते ७० फूट खोलीचे घेऊन त्याशेजारी अंदाजे २ बाय २ च्या खड्ड्यात मुरूम, वाळू भरून त्याचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. बऱ्याच ठिकाणी हे पुनर्भरण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने भविष्यात यातून उद््भवू शकणाऱ्या परिणामांनाही ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. देऊर गावात संबंधित ठेकेदारांनी नुकतेच बोअरवेल पुनर्भरणाचे काम केले आहे. परंतु, बोअरवेलच्या शेजारील गटारे नेहमीच तुंबलेली असल्याने हे पाणी या खड्ड्यात उतरून तेच सांडपाणी या बोअरवेलच्या माध्यमातून लोकांना प्यावे लागण्याची शक्यता आहे. कोरेगाव तालुक्यातील आसनगाव, पळशी, देऊर या गावांत ही कामे सुरू असून, आणखीही काही गावांमध्ये ती सुरू केली जाणार आहेत. ती योग्य पद्धतीने केली जावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)