शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हॉटेल, दुकानांवर पालिकेचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

सातारा : अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर कटाक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेने पाच पथकांची नेमणूक केली आहे. अत्यावश्यक सेवेत नसताना ...

सातारा : अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर कटाक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेने पाच पथकांची नेमणूक केली आहे. अत्यावश्यक सेवेत नसताना जर कोणी कोणी दुकान उघडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील अशांवरही पालिका कारवाई करणार आहे.

राज्य शासनाने दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक दुकानदार लपून-छपून व्यवसाय करीत असल्याचा प्रशासनाला पूर्व अनुभव आहे. त्यामुळे अशा दुकानदार, व्यावसायिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने पाच विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके शहरात गस्त घालून अशा दुकानदारांचा शोध घेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची दुकाने तातडीने सील केली जात आहेत.

दरम्यान, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे दुकानदार, विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पालिकेने नियमांचे उल्लंघन करणारी १५ दुकाने आतापर्यंत सील केली असून, काहींवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने पालिकेने यंदा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व्हे नागरिकांची कोरोना चाचणी व लसीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

(चौकट)

कोरोना चाचणीसाठी शिबिर

सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ज्या अपार्टमेंटमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत अशा ठिकाणी शिबिर आयोजित करून नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. शहरात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे.

(चौकट)

प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हे

सातारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील संख्या ९९ इतकी झाली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा पालिकेकडून सर्व्हे केला जात आहे. येथील नागरिकांच्या आरोग्य नोंदी दररोज घेतल्या जात आहेत. अंगणवाडी सेविकांचे पथक या कामी नेमण्यात आले आहे.

(कोट)

कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. सध्या प्रशासनाने कोरोना चाचणी, लसीकरणावर अधिक भर दिला आहे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात वेळोवेळी सर्व्हे केला जात आहे. निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. शिबिराचे आयोजन करून नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा.

- अभिजित बापट, मुख्याधिकारी