शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

हॉटेल, दुकानांवर पालिकेचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

सातारा : अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर कटाक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेने पाच पथकांची नेमणूक केली आहे. अत्यावश्यक सेवेत नसताना ...

सातारा : अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर कटाक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेने पाच पथकांची नेमणूक केली आहे. अत्यावश्यक सेवेत नसताना जर कोणी कोणी दुकान उघडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील अशांवरही पालिका कारवाई करणार आहे.

राज्य शासनाने दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक दुकानदार लपून-छपून व्यवसाय करीत असल्याचा प्रशासनाला पूर्व अनुभव आहे. त्यामुळे अशा दुकानदार, व्यावसायिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने पाच विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके शहरात गस्त घालून अशा दुकानदारांचा शोध घेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची दुकाने तातडीने सील केली जात आहेत.

दरम्यान, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे दुकानदार, विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पालिकेने नियमांचे उल्लंघन करणारी १५ दुकाने आतापर्यंत सील केली असून, काहींवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने पालिकेने यंदा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व्हे नागरिकांची कोरोना चाचणी व लसीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

(चौकट)

कोरोना चाचणीसाठी शिबिर

सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ज्या अपार्टमेंटमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत अशा ठिकाणी शिबिर आयोजित करून नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. शहरात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे.

(चौकट)

प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हे

सातारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील संख्या ९९ इतकी झाली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा पालिकेकडून सर्व्हे केला जात आहे. येथील नागरिकांच्या आरोग्य नोंदी दररोज घेतल्या जात आहेत. अंगणवाडी सेविकांचे पथक या कामी नेमण्यात आले आहे.

(कोट)

कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. सध्या प्रशासनाने कोरोना चाचणी, लसीकरणावर अधिक भर दिला आहे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात वेळोवेळी सर्व्हे केला जात आहे. निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. शिबिराचे आयोजन करून नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा.

- अभिजित बापट, मुख्याधिकारी