शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

हॉटेल, दुकानांवर पालिकेचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

सातारा : अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर कटाक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेने पाच पथकांची नेमणूक केली आहे. अत्यावश्यक सेवेत नसताना ...

सातारा : अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर कटाक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेने पाच पथकांची नेमणूक केली आहे. अत्यावश्यक सेवेत नसताना जर कोणी कोणी दुकान उघडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील अशांवरही पालिका कारवाई करणार आहे.

राज्य शासनाने दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक दुकानदार लपून-छपून व्यवसाय करीत असल्याचा प्रशासनाला पूर्व अनुभव आहे. त्यामुळे अशा दुकानदार, व्यावसायिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने पाच विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके शहरात गस्त घालून अशा दुकानदारांचा शोध घेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची दुकाने तातडीने सील केली जात आहेत.

दरम्यान, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे दुकानदार, विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पालिकेने नियमांचे उल्लंघन करणारी १५ दुकाने आतापर्यंत सील केली असून, काहींवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने पालिकेने यंदा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व्हे नागरिकांची कोरोना चाचणी व लसीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

(चौकट)

कोरोना चाचणीसाठी शिबिर

सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ज्या अपार्टमेंटमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत अशा ठिकाणी शिबिर आयोजित करून नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. शहरात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे.

(चौकट)

प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हे

सातारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील संख्या ९९ इतकी झाली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा पालिकेकडून सर्व्हे केला जात आहे. येथील नागरिकांच्या आरोग्य नोंदी दररोज घेतल्या जात आहेत. अंगणवाडी सेविकांचे पथक या कामी नेमण्यात आले आहे.

(कोट)

कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. सध्या प्रशासनाने कोरोना चाचणी, लसीकरणावर अधिक भर दिला आहे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात वेळोवेळी सर्व्हे केला जात आहे. निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. शिबिराचे आयोजन करून नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा.

- अभिजित बापट, मुख्याधिकारी