शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
4
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
5
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
6
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
7
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
8
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
9
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
10
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
11
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
12
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
13
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
14
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
15
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
16
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
17
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
18
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
19
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
20
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या बाजारात गाढवांनाच ‘बोली’

By admin | Updated: April 30, 2016 00:54 IST

शेतकरी हतबल : कवडीमोल झाली जनावरे; गाय, म्हैस केवळ पाच हजारांत तर गाढव वीस हजाराला; म्हणे गाढवांना दुष्काळ नसतो

सातारा : जागतिक स्तरावर भारत हा शेतीप्रधान देश म्हणून संबोधला जातो; पण त्याच देशातील कृषी व्यवस्था संकटात सापडली आहे. दुष्काळामुळे शेती उत्पादन घटले आहे; पण शेतकऱ्यांचे आर्थिक स्थर उंचाविण्यासाठी पूरक ठरणारी जनावरे ही आता कवडीमोल भावाने विकली जात आहेत. अशा कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या जनावरांनाही भाव नाही. उलट आठवड्याच्या बाजारात गाढवांनाच अधिक बोली लागू लागली आहे.
संपूर्ण राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. जगायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे. शेती आहे पण पाणी नाही. अशा अवस्थेत सापडेलला शेतकरी दिशाहिन झाला आहे. दैनंदिन शेतीची कामे करण्याची क्षमता त्याच्यात आता उरली नाही. जीवापाड प्रेम केलेली व जपलेली शेती पाण्याविना नुसतीच कोरडी पाहून ‘दु:ख सांगू कोणाला,’ अशी अवस्था त्याची झाली आहे. निसर्गाच्या आशेवर जगणाऱ्या या शेतकऱ्याचे जीवन मातीमोल ठरत आहे. शेतीवर आधारित असणारे कुटुंब व पोटाच्या मुलाबाळाप्रमाणे सांभाळलेली जनावरे ही आता त्याला ओझे वाटू लागली आहेत. पाणी नाही चारा नाही. यामुळे जनावरांचे ही हाल होऊ लागले आहेत. हे हाल आता शेतकऱ्यालाही बघवत नाहीत. डोळ्या देखत जनावरे चाऱ्याविना, पाण्याविना तडफडत आहेत. हे दु:ख त्याला उघड्या डोळ्यांनी पाहवे लागत आहे.
एकेकाळी जनावरांच्या जीवावर फुलवलेली शेती केवळ दुष्काळामुळे या जनावरांना आठवड्याच्या बाजारात विक्रीला काढावे लागत आहे. गोठ्यातील गाई, म्हैस, बैल यांच्याकडे पाहून अनेक वेळा शेतकऱ्याचे मन भरून येते; पण तो ही आता परिस्थितीपुढे हातबल झाला आहे.
कर्जापायी नामशेष होत असलेले शेतकरी आलेली परिस्थती पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत. शेती उत्शधपन्न नाही; पण कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेक वेळा जनावरांची विक्री करायचा प्रयत्न करूनही योग मोबदला मिळत नाही. गाय, म्हैस, बैल यापेक्षा आठवड्याच्या बाजारात आता दलालांकडून गाढवांची बोली अधिक लागत आहे. हे दु:ख ही आता त्याला सहन करावे लागत आहे.
वास्तविक शेतकऱ्यांच्या जीवनात जनावरांचे मोल अनमोल असताना केवळ ओढवलेल्या आजच्या परिस्थितीने जनावरांची किंमत कवडीमोड ठरत आहे. दुष्काळामुळे ओढलेल्या संकटात इच्छा नसतानाही आपली जनावरे विक्रीला काढावी लागत आहेत.
काळाच्या ओघात शेतकऱ्यांच्या जनावरांना किंमत नाही; पण ओझी वाहणाऱ्या गाढवानाच मात्र किंमत वाढली आहे. हे दुष्काळजन्य परिस्थितीने सिद्ध केले आहे.
जनावरांच्या बाजारात शेतकऱ्याच्या जनावरापेक्षा दलालाच्या शब्दाला किंमत अधिक असल्याचे दिसून येते. दुष्काळाशी सामना करणारा शेतकरी हतबल होऊन जनावरे मिळेल त्या किमतीला विक्रीला काढत आहे. जनावराचे हाल होण्यापेक्षा विक्रीतून त्याची मुक्तता करण्याकडेच शेतकऱ्याचा कल आहे. बाजारात जनावरे विक्रीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने घेऊन जात आहेत. निसर्गानेच दगा दिल्याने कोणाच्या भरवशावर जनावरे ठेवायची, असा आक्रोश करीत शेतकरी स्वत:च्या नशिबालाच दोष देत आहेत. शेतकरी मिळेल तो भाव पदरात पाडून स्वत:ची मुक्तता करीत आहे. (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांची नेहमीच उपेक्षा होत असते. जीवापाड जपलेल्या जनावरांना कवडीमोल दरात विकताना शेतकऱ्यांना परवडणारे नसते. मात्र यापेक्षा आणखी त्यांचे हाल व्हायला नको. म्हणून जनावरांना विकणे शेतकरी पसंत करत आहेत.
- श्रीरंग काटेकर (सामाजिक कार्यकर्ते, सातारा )