शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पडण्याआधीच जामानिमा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा ...

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा परिसर, कास, बामणोली, तापोळा, पांगारे खोरे, पाटण, कोयना त्याला लागून असलेला वारणा धरणापर्यंतच्या या सातारा जिल्ह्याच्या परिसरात पावसाळ्यापूर्वी स्थानिक नागरिकांची एकच भिरकिट सुरु असते. पावसाळ्यापूर्वीच चार महिन्यांचा जामानिमा गोळा करण्याची...!

हा सर्वच परिसर अत्यंत दुर्गम आहे. पावसाळ्याचे चार महिने या परिसरातील गावांचा शहरांशी संपर्क तुटतो. रस्ते खचतात, नद्या, ओढ्यांना पूर येतो, शेतात चिखलराड साठते, मी म्हणणारा पाऊस अंगावर झेलण्यासाठी घरे सज्ज करण्याच्या कामात स्थानिक जनता गुंतलेली असते. उन्हाळा असतो तेव्हाच काही तयारी केली नाही तर मग उपासमार अन् अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.

कोकणाला लागून असलेल्या या परिसरातील नागरिकांचे राहणीमान हे कोकणी पध्दतीचेच आहे. तुकड्या तुकड्यांची शेती, गुरे -ढोरे, मासेमारी हीच या लोकांची संपत्ती आहे. या परिसरात पावसाचा जोर इतका असतो की, घरातून बाहेर पडणेदेखील कठीण होऊन जाते. स्वयंपाक हा मुख्यत्वे चुलीवरच होत असल्याने उन्हाळ्यातच वाळलेली लाकडे गोळा करण्याचे काम चालते. वाळलेली झाडे अथवा झाडांचा फांद्या तोडून त्या उन्हात वाळवल्या जातात. त्या चांगल्या वाळल्या की मग घरातील सर्वजण मिळून हे पूर्ण सुकलेले जळण माळ्यावर रचतात. पाऊस जरी सप्टेंबरनंतरही लांबला तरी या जळणाचा आधार त्यांना असतो.

पावसाळ्यात घरांना झडपा घातल्या जातात. यामुळे भिंती भिजत नाहीत. घरांवरील कौलांची शेकरण केली जाते. घरामध्ये पाऊस येऊ नये, यासाठी ही उपाययोजना असते. यासोबतच पोटासाठी लागणारा पैसाही सुरक्षितपणे साठवून ठेवला जातो. चटणी, तेल, मीठ, तांदूळ, ज्वारी एवढं जरी जवळ असलं तरी मग रानभाज्या, मासे खाऊनच हे लोक दिवस काढतात. जनावरांचीदेखील व्यवस्थित सोय केली जाते. गोठ्यांची दुरुस्ती करुन घेतली जाते. घरात पाणी घुसू नये, यासाठी ताली बांधल्या जातात. हा सर्व जामानिमा गोळा करुन ठेवण्याची परंपरागत पद्धत या भागात आहे.

पश्चिम भागात ही चालतात कामे...

तरव्याच्या भाजण्या, नांगरणीची कामे, भातखाचरांची डागडुजी, नाचणी शेतीची मशागत, ताली धरणे, पाण्यासाठी पाट तयार करणे, नवीन वावरं तयार करणे. काट्याकुट्यांची अडगळ बाजूला करणे, पडक्या नादुरूस्त भिंती दुरूस्त करणे, घरांची झाडलोट, ढापावरील कचरा काढून कपड्यावरून बांधणी, झडपी बांधणे, घर शाकारणे, लाकडं, शेणकुट, गवत भरणे, गवताच्या राख्या राखून कुंपण करणे, ताली बांधणे, नवीन गोठा तयार करणे, झरा सुरक्षित ठेवणे, चारा गंजी रचणे, शेणारा रचणे, अन्नधान्य साठवणूक करणे ही कामे उन्हाळ्यातच केली जातात.

(सागर गुजर)

फोटो नेम : २४ सागर ०१,०२,०३