शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

स्थलांतरित मुलांसाठी हवा युनिक आयडी; प्रशासनाबरोबरच साखर कारखान्यांवरही जबाबदारी देण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 03:35 IST

आपल्या मूलभूत हक्कांविषयी पुरेशी जागृती नसलेल्या या कामगारांचीही शासकीय पातळीवर नोंद होत नाही.

- प्रगती जाधव-पाटीलसातारा : ऊसतोडीसाठी येणाऱ्या कामगारांचा फिरण्याचा पॅटर्न ठरलेला आहे. त्यात फारसा बदल होत नाही, तरीही दरवर्षी केवळ नोंदणी नसल्यामुळे त्यांच्या मुलांना शासकीय सोयी पुरविणे प्रशासनाला कठीण जात आहे. गाव सोडताना आणि नव्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर या टोळीतील मुलांना युनिक आयडी दिले गेले, तर त्यांना ट्रॅक करणे शक्य होऊन शासकीय सोयी पुरविणे सोपे होईल.राज्यात ऊसतोडीबरोबरच वीटभट्ट्यांवर काम करणा-या टोळ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होतात. पावसाचे तीन महिनेच ते त्यांच्या मूळगावी राहतात, त्यानंतर त्यांची भटकंती सुरू होते. या कामगारांना एका ठिकाणी अगदी सव्वा ते दीड महिन्याचा रोजगार मिळतो. त्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी स्थलांतरित होतात.आपल्या मूलभूत हक्कांविषयी पुरेशी जागृती नसलेल्या या कामगारांचीही शासकीय पातळीवर नोंद होत नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर येणाºया मुलांच्याही बाबत शासकीय पातळीवर दुर्लक्ष होत आहे. स्वत:च्या रोजगाराबरोबरच शेतकरी आणि साखर कारखाने यांच्या सोयीसाठी हे कामगार स्थलांतरित होतात; पण ठोसपणे त्यांची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही.या भटकंतीला आता शिस्त लावण्याची आणि शासनस्तरावर नोंद होण्याची वेळ आली आहे. याची जबाबदारी शासनाबरोबरच साखर कारखान्यांवरही देण्याचा मतप्रवाह आहे.ज्यांच्या प्रांगणात येऊन हे कामगार विसावतात, त्यांनीच कामगारांची माहिती शासकीय यंत्रणांपर्यंत पोहोचवली, तर तिथे हंगामी अंगणवाडी सुरू करून मुलांबरोबरच मातांच्याही पोषणाचा विचार करणे सोपे होईल. राज्यातील अनेक भागांत कामगारांच्या निवासाच्या ठिकाणापासून शाळा जवळ असेल तर तिथे या कामगारांच्या मुलांना बसविण्यात येते; पण या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थी स्वत:सोबत घेत नसल्याचे पाहणीतील निष्कर्ष आहेत. त्यामुळे या वर्गांमध्ये बसून विद्यार्थी अस्वस्थ होतात आणि त्यानंतर पुन्हा कधीच शाळेकडे फिरकत नाहीत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्यापेक्षा त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक आहे.संस्थांसह ‘सीएसआर’चाही हातभार आवश्यकऊसतोड आणि वीटभट्टी कामगार दिवसभर कष्ट करून त्यांच्या दोनवेळच्या अन्नाची तजवीज करीत आहेत. मात्र, त्यांच्या कामाच्या वेळेमुळे मुलांचे आरोग्य आणि शिक्षण या दोन्हींकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.मुलांसाठी पाळणाघराची सोय हवीऊसतोड कामगारांचा दिवस पहाटे तीन वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी पाच वाजता मावळतो. ऊसतोडणीच्या ठिकाणापासून मुक्कामाचे अंतर लांब असल्याने कामगार आपल्या चिमुरड्यांना सोबत नेतात. त्यामुळे शासकीय वेळेत ही मुले त्यांच्या पालावर सापडत नाहीत. या मुलांनी पालकांबरोबर शेतावर जाण्यापेक्षा त्यांच्या पालाजवळच पाळणाघराची सोय उपलब्ध करून दिली तर त्यांची भटकंती थांबेल अन् शिक्षण आणि पोषण दोन्ही त्यांना उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.अन्य जिल्ह्यांत जाणाºया मुलांची माहिती बºयाचदा शिक्षकांना असते, त्यामुळे स्थलांतरित होणाºया गावातील आणि स्थलांतरित झालेल्या गावातील शाळा हेडमास्तर किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे सरल पोर्टलवर ही मुले नोंदविण्याची जबाबदारी देण्यात यावी. युनिक आयडीमार्फत त्यांच्यापर्यंत ही माहिती देण्याच्या सूचना साखर कारखाना किंवा टोळीप्रमुख यांना केल्या, तर मुलांपर्यंत पोषण आहार पोहोचविणे सहज शक्य होईल.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, सातारा

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर