शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:01 IST

farmar, diwali, sataranews खटाव तालुक्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वंच पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी लवाजम्यासहित हजेरी लावली होती. परंतु दिवाळी आली तरी एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे कोरोना संकटातील दिवाळी गोड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत गोड दिवाळीची अपेक्षा : खटाव तालुक्यातील तीन हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण

कातरखटाव : खटाव तालुक्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वंच पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी लवाजम्यासहित हजेरी लावली होती. परंतु दिवाळी आली तरी एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे कोरोना संकटातील दिवाळी गोड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.खटाव तालुक्यातील कान्हरवाडी, कणसेवाडी, एनकूळ, कातरखटाव, पळसगाव, खातवळ, येलमरवाडी, बोबोळे, डांभेवाडी या गावांतील क्षेत्रामध्ये काही ठिकाणी नाला बंडिंग, बंधारे फुटल्याने पिकाबरोबर जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात परतीच्या धो-धो पडणाऱ्या पावसाने खरीप हंगामातील मका, भुईमूग, सोयाबीन, मटकी, मूग, बाजरी ही हातातोंडाला आलेली पिकं पाण्यात गेली आहेत.

अजूनही कान्हरवाडीसह काही भागात शेतामध्ये पाणी दिसून येत आहे. त्यामुळे रब्बी पेरणीचा हंगाम वाया जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली आहे. तरीही प्रशासनाकडून मदतीचा पत्ताच नसल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे पाच ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी ऐन दिवाळीत मदत मिळत नसल्यामुळे पूर्णतः कोलमडलेला दिसून येत आहे. प्रशासनाकडून अजून पंचनामे केलेले कागदोपत्री जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे आश्वासन मिळत असून गेली आठ महिने झाली कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचं दिवाळं निघाल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे आमचे मका, बाजरी, भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे जोमाने करण्यात आले आहेत. परंतु भरपाई कधी मिळणार हे कोणीही सांगायला तयार नाहीत. कमीत कमी बियाणांचा तरी खर्च द्या.- बापूराव वाघमारे,शेतकरी, कान्हरवाडी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरDiwaliदिवाळी