शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:01 IST

farmar, diwali, sataranews खटाव तालुक्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वंच पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी लवाजम्यासहित हजेरी लावली होती. परंतु दिवाळी आली तरी एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे कोरोना संकटातील दिवाळी गोड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत गोड दिवाळीची अपेक्षा : खटाव तालुक्यातील तीन हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण

कातरखटाव : खटाव तालुक्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वंच पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी लवाजम्यासहित हजेरी लावली होती. परंतु दिवाळी आली तरी एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे कोरोना संकटातील दिवाळी गोड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.खटाव तालुक्यातील कान्हरवाडी, कणसेवाडी, एनकूळ, कातरखटाव, पळसगाव, खातवळ, येलमरवाडी, बोबोळे, डांभेवाडी या गावांतील क्षेत्रामध्ये काही ठिकाणी नाला बंडिंग, बंधारे फुटल्याने पिकाबरोबर जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात परतीच्या धो-धो पडणाऱ्या पावसाने खरीप हंगामातील मका, भुईमूग, सोयाबीन, मटकी, मूग, बाजरी ही हातातोंडाला आलेली पिकं पाण्यात गेली आहेत.

अजूनही कान्हरवाडीसह काही भागात शेतामध्ये पाणी दिसून येत आहे. त्यामुळे रब्बी पेरणीचा हंगाम वाया जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली आहे. तरीही प्रशासनाकडून मदतीचा पत्ताच नसल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे पाच ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी ऐन दिवाळीत मदत मिळत नसल्यामुळे पूर्णतः कोलमडलेला दिसून येत आहे. प्रशासनाकडून अजून पंचनामे केलेले कागदोपत्री जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे आश्वासन मिळत असून गेली आठ महिने झाली कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचं दिवाळं निघाल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे आमचे मका, बाजरी, भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे जोमाने करण्यात आले आहेत. परंतु भरपाई कधी मिळणार हे कोणीही सांगायला तयार नाहीत. कमीत कमी बियाणांचा तरी खर्च द्या.- बापूराव वाघमारे,शेतकरी, कान्हरवाडी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरDiwaliदिवाळी