शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:01 IST

farmar, diwali, sataranews खटाव तालुक्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वंच पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी लवाजम्यासहित हजेरी लावली होती. परंतु दिवाळी आली तरी एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे कोरोना संकटातील दिवाळी गोड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत गोड दिवाळीची अपेक्षा : खटाव तालुक्यातील तीन हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण

कातरखटाव : खटाव तालुक्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वंच पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी लवाजम्यासहित हजेरी लावली होती. परंतु दिवाळी आली तरी एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे कोरोना संकटातील दिवाळी गोड होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.खटाव तालुक्यातील कान्हरवाडी, कणसेवाडी, एनकूळ, कातरखटाव, पळसगाव, खातवळ, येलमरवाडी, बोबोळे, डांभेवाडी या गावांतील क्षेत्रामध्ये काही ठिकाणी नाला बंडिंग, बंधारे फुटल्याने पिकाबरोबर जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात परतीच्या धो-धो पडणाऱ्या पावसाने खरीप हंगामातील मका, भुईमूग, सोयाबीन, मटकी, मूग, बाजरी ही हातातोंडाला आलेली पिकं पाण्यात गेली आहेत.

अजूनही कान्हरवाडीसह काही भागात शेतामध्ये पाणी दिसून येत आहे. त्यामुळे रब्बी पेरणीचा हंगाम वाया जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली आहे. तरीही प्रशासनाकडून मदतीचा पत्ताच नसल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे पाच ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी ऐन दिवाळीत मदत मिळत नसल्यामुळे पूर्णतः कोलमडलेला दिसून येत आहे. प्रशासनाकडून अजून पंचनामे केलेले कागदोपत्री जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे आश्वासन मिळत असून गेली आठ महिने झाली कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचं दिवाळं निघाल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे आमचे मका, बाजरी, भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे जोमाने करण्यात आले आहेत. परंतु भरपाई कधी मिळणार हे कोणीही सांगायला तयार नाहीत. कमीत कमी बियाणांचा तरी खर्च द्या.- बापूराव वाघमारे,शेतकरी, कान्हरवाडी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरDiwaliदिवाळी