शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

अर्धा पावसाळा संपला तरी झळ; दीड लाखावर ग्रामस्थ पाणी टंचाईच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 8:43 PM

पश्चिम भागात मात्र पाऊस झाला होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईची स्थिती निर्माण झालेली.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील १०० गावांना अजूनही टँकरने पाणी...

सातारा : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी अजूनही दुष्काळी भागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे आजही दीड लाखावर नागरिक आणि ८२ हजार पशुधन १२१ टँकरवर अवलंबून आहेत. टंचाईची सर्वाधिक झळ माण तालुक्याला बसत आहे. माणमधील ७६ गावे आणि ५७४ वाड्यांना अजनूही टँकरचाच आधार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पूर्व भागात सुरुवातीला कमी पाऊस झाला. तर त्यानंतर परतीचा पाऊसही पडला नाही. पश्चिम भागात मात्र पाऊस झाला होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईची स्थिती निर्माण झालेली. तसेच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न समोर आलेला. त्यामुळे राज्य शासनालाही दुष्काळ जाहीर करावा लागलेला. नोव्हेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मात्र जानेवारी महिन्यानंतर टंचाई स्थिती अधिक गडद होत गेली.सध्या तर पावसाळा ऋतू सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. तरीही पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे पावसाने उघडीप दिलेली आहे. पूर्वेकडे सुरुवातीला पाऊस झाला; पण तो टंचाई दूर करणारा ठरला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या काही केल्या मोठ्या प्रमाणात कमी झाली नाही. सध्या जिल्ह्यात १०० गावे आणि ६९३ वाड्यांतील १ लाख ६८ हजार ५२१ लोकांना आणि ८२ हजार १०२ पशुधनाला टँकरचा आधार आहे. त्यासाठी १२१ टँकर सुरू असून, त्याला २५७ खेपा मंजूर झालेल्या आहेत.

दुष्काळाची तीव्रता अजूनही माण तालुक्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील ७६ गावे आणि ५७४ वाड्या तहानलेल्या आहेत. त्यासाठी १०२ टँकर सुरू आहेत. मागील आठवड्यात तुलनेत एक टँकर कमी झालाय. तालुक्यातील १ लाख ४० हजार २२३ नागरिक टँकरवर अवलंबून आहेत. तर खटाव तालुक्यातील १८ गावे आणि ८३ वाड्यांसाठी १३ टँकर सुरू आहेत. या माध्यमातून १४ हजारांवर लोकांना पाणी देण्यात येते. कोरेगाव तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत. सातारा, महाबळेश्वर, क-हाड, पाटण या तालुक्यांतील ही टँकर पहिल्या पावसानंतरच बंद झाले आहेत.फलटणमध्येही सहा टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात सध्या माण, खटाव फलटण याच तालुक्यांत टँकर सुरू आहेत. इतर तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत. फलटण तालुक्यातील ६ गावांना आणि ३६ वाड्यांना टंचाईची झळ अजूनही बसत आहे. त्यासाठी सहा टँकर सुरू आहेत. तालुक्यातील १३ हजार ६३१ नागरिक आणि ६ हजार २३४ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. आता पावसाळ्याचा दीड महिनाच बाकी आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला तरच दुष्काळी तालुक्यातील टँकर हटणार आहेत, अन्यथा भयंकर स्थितीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर