शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अर्धा पावसाळा संपला तरी झळ; दीड लाखावर ग्रामस्थ पाणी टंचाईच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 20:44 IST

पश्चिम भागात मात्र पाऊस झाला होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईची स्थिती निर्माण झालेली.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील १०० गावांना अजूनही टँकरने पाणी...

सातारा : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी अजूनही दुष्काळी भागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे आजही दीड लाखावर नागरिक आणि ८२ हजार पशुधन १२१ टँकरवर अवलंबून आहेत. टंचाईची सर्वाधिक झळ माण तालुक्याला बसत आहे. माणमधील ७६ गावे आणि ५७४ वाड्यांना अजनूही टँकरचाच आधार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पूर्व भागात सुरुवातीला कमी पाऊस झाला. तर त्यानंतर परतीचा पाऊसही पडला नाही. पश्चिम भागात मात्र पाऊस झाला होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईची स्थिती निर्माण झालेली. तसेच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न समोर आलेला. त्यामुळे राज्य शासनालाही दुष्काळ जाहीर करावा लागलेला. नोव्हेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मात्र जानेवारी महिन्यानंतर टंचाई स्थिती अधिक गडद होत गेली.सध्या तर पावसाळा ऋतू सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. तरीही पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे पावसाने उघडीप दिलेली आहे. पूर्वेकडे सुरुवातीला पाऊस झाला; पण तो टंचाई दूर करणारा ठरला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या काही केल्या मोठ्या प्रमाणात कमी झाली नाही. सध्या जिल्ह्यात १०० गावे आणि ६९३ वाड्यांतील १ लाख ६८ हजार ५२१ लोकांना आणि ८२ हजार १०२ पशुधनाला टँकरचा आधार आहे. त्यासाठी १२१ टँकर सुरू असून, त्याला २५७ खेपा मंजूर झालेल्या आहेत.

दुष्काळाची तीव्रता अजूनही माण तालुक्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील ७६ गावे आणि ५७४ वाड्या तहानलेल्या आहेत. त्यासाठी १०२ टँकर सुरू आहेत. मागील आठवड्यात तुलनेत एक टँकर कमी झालाय. तालुक्यातील १ लाख ४० हजार २२३ नागरिक टँकरवर अवलंबून आहेत. तर खटाव तालुक्यातील १८ गावे आणि ८३ वाड्यांसाठी १३ टँकर सुरू आहेत. या माध्यमातून १४ हजारांवर लोकांना पाणी देण्यात येते. कोरेगाव तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत. सातारा, महाबळेश्वर, क-हाड, पाटण या तालुक्यांतील ही टँकर पहिल्या पावसानंतरच बंद झाले आहेत.फलटणमध्येही सहा टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात सध्या माण, खटाव फलटण याच तालुक्यांत टँकर सुरू आहेत. इतर तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत. फलटण तालुक्यातील ६ गावांना आणि ३६ वाड्यांना टंचाईची झळ अजूनही बसत आहे. त्यासाठी सहा टँकर सुरू आहेत. तालुक्यातील १३ हजार ६३१ नागरिक आणि ६ हजार २३४ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. आता पावसाळ्याचा दीड महिनाच बाकी आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला तरच दुष्काळी तालुक्यातील टँकर हटणार आहेत, अन्यथा भयंकर स्थितीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर