शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
2
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
3
लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
4
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
5
आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!
6
गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
7
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

सातारा जिल्ह्यातील १०० गावांचं पाऊल प्लास्टिक कचरामुक्तीकडे

By नितीन काळेल | Published: December 11, 2023 7:05 PM

जिल्हा परिषदेचा पुढाकार; गावांचं बकालपण जाणार

सातारा : कचरा न संपणारी गोष्ट आहे. शहराप्रमाणचे ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या आहे. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने गावांना बकाल रुप येत आहे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने १०० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करुन प्लास्टिकमुक्तीकडे पाऊल टाकले आहे. त्यामुळे भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.

कचरा हा आरोग्यासाठी घातकच. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावावी लागते. शहराच्या ठिकाणी घंटागाडीतून कचरा नेण्यात येतो. पण, प्लास्टिक कचऱ्याची समस्या आहेच. कारण, शहरातील रस्त्यांच्या बाजुने पाहिले तर सर्वत्र प्लास्टिकच दिसून येते. तर ग्रामीण भागात ओला आणि सुका कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही हेही वास्तव आहे. त्यातच प्लास्टिकने गावांना बकालरुप येत आहे. रस्ते असो किंवा ओढे, नाले, नद्या अशा ठिकाणी प्लास्टिक कचराच दिसतो. या कचऱ्याचे वर्गीकरणच होत नाही. त्यामुळे गावांना बकालपण येत आहे. हे बकालपण टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला आहे.ग्रामपंचायतींना १५ वा वित्त आयोग तसेच विविध याेजनांतून निधी मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचीही जबाबदारी लोकांना सुविधा पुरविण्याची आहे. त्यामुळे आता प्लास्टिक कचऱ्याची समस्या टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनाही एक पाऊल उचलावे लागत आहे. यासाठी ग्रामस्थांनी घरातील प्लास्टिक उंबऱ्या बाहेर येऊ नये यासाठी दक्षता घ्यायची आहे. घरातच प्लास्टिक गोळा करुन ठेवायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने आठवड्यातून एकदातरी घरातील प्लास्टिक जमा करणे आवश्यक आहे.नंतर या प्लास्टिक कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करुन ते पुन्हा वापरात कसे येईल, हे पाहिले जाणार आहे. अशाप्रकारे प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यात १०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आलेली आहे. यामुळे गावातील प्लास्टिक कचऱ्यांचे ढिगारे कमी होणार आहेत. तसेच कोठेही प्लास्टिक दिसणार नाही. त्यामुळे गावाचे बकालपणही जाण्यास मदत होणार आहे. या सर्व प्रक्रियेत ग्रामपंचायतींची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे.

यावर चालणार काम..

प्लास्टिक मुक्तीसाठी १०० ग्रामपंचायतींची निवड झालेली आहे. यामध्ये त्रिसुत्रीचा वापर केला जाणार आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, त्याचा पुन्हा वापर करणे आणि प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया ही त्रिसुत्री राहणार आहे.

आपले गाव स्वच्छ आणि सुंदर असणे महत्वाचे असते. यासाठी कचरामुक्त गाव ठेवण्याची गरज आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे तर गावांचे साैंदर्य हरवतं. यासाठी प्लास्टिक कचरा उघड्यावर पडू नये यासाठी जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामस्थांनी प्लास्टिक घरात गोळा करायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायती प्लास्टिक जमा करुन ते पुढील पुर्नप्रक्रियेससाठी पाठवतील. यामुळे गावे कचरामुक्त होतील. - अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlastic banप्लॅस्टिक बंदीzpजिल्हा परिषद