शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

समितीविना निराधार वाऱ्यावर

By admin | Updated: April 6, 2015 01:20 IST

बैठकाच नाहीत : पेन्शनपासून लाभार्थी वंचित, उपजीविकेचा प्रश्न

सांगली : निराधारांसाठी आधार ठरलेल्या श्रावणबाळ, संजय गांधी या योजनांसाठी अशासकीय समिती गठित न झाल्याने हजारो लाभार्थी पेन्शनपासून वंचित राहिले आहेत. गेल्या पाच महिन्यांत समिती नसल्याने बैठक झाली नाही, यामुळे नवे निराधारांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे निराधार वृध्द, विधवा, अपंगांच्या निर्वाह वेतनाची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृध्द योजना आदी योजनांद्वारे निराधार व दारिद्र्य रेषेखालील व्याक्तींना सहाशे ते हजार रुपायांपर्यंतची केंद्र व राज्य शासनाकडून पेन्शन देण्यात येते. याचा हजारो निराधार व्यक्ती लाभ घेत असतात. प्रत्येक महिन्याला नव्या लाभार्थींची यामध्ये निवड करण्यात येते. लाभार्थीची निवड करण्यासाठी अशासकीय समिती नियुक्त करण्यात येते. त्यांच्या शिफारसीनंतर निराधार योजनेच्या तहसीलदारांकडून याची निवड करण्यात येते. त्यानंतर अशा निराधारांना पेन्शन योजना सुरू होते. निराधार वृध्द, विधवा, अपंग यांना उदरनिर्वाहासाठी ही योजना आधार ठरली आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून यासाठी अशासकीय समितीची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे याचे काम रखडले आहे. पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष व इतर सदस्य नियुक्त करतात. नवे सरकार आल्यापासून ही समितीच गठित झाली नाही. यामुळे निराधारांना मार्गदर्शन मिळणे बंद होण्याबरोबरच योग्य लाभार्थी शोधणेही बंद झाले आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपआपल्या भागातील लाभार्थी शोधून त्यांना अशा पेन्शनचा लाभ मिळवून देत होते. त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या कागदत्रांसाठीही कार्यकर्त्यांची मदत लाभार्थींना होत होती. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून हे कामच थांबले आहे.
या योजनेचे अधिकार सध्या प्रांतांना आहेत, मात्र त्यांनी यासाठी बैठक घेतली नाही. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी निराधार तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून धडपडत आहेत. मात्र समितीची बैठक झाली नसल्याने त्यांचे काम रखडले आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जुनी समिती बरखास्त झाल्यामुळे वृध्द, विधवा, अपंग यांच्या प्रकरणांची मंजुरी थांबल्याने निराधारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)