शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार : वैभव नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 5:20 PM

शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.

ठळक मुद्देपाण्यासाठी संघर्ष करावा लागणार : वैभव नायकवडी आटपाडीत शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेची बैठक

आटपाडी : शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.आटपाडीतील तांबडा मारुती देवालयाच्या सभागृहात शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी बोलताना नायकवडी म्हणाले, पाण्याचे समान वाटप करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णांनी १३ दुष्काळी तालुक्यात पाणी येण्याचे स्वप्न पाहिले होते, हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा तीव्र करण्यात येईल. शेतात पाणी बघणार आणि मगच चळवळ थांबणार आहे. पाणी परिषद यशस्वी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, पावसाळ्यात पुराचे पाणी कृष्णा नदीतून वाहून जाते. त्यावेळीच नियोजन करून दुष्काळी भागाला हे वाहून जाणारे पाणी दिले पाहिजे. पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे.माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, टेंभू योजनेची पाण्याची आवर्तने ठरली पाहिजेत. आटपाडी तालुक्यातील वगळलेल्या गावांचा समावेश टेंभू योजनेत केला गेला पाहिजे. राजेवाडी तलावात पाणी आले पाहिजे.बैठकीत प्रारंभी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. बाबूराव गुरव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, प्रा. विश्वंभर बाबर, चंद्रकांत देशमुख, आर. एस. चोपडे, शिवाजीराव पाटील, बाळासाहेब नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली