शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सत्ता आहे; पण सत्तासूत्रे नाहीत, सांगली जिल्ह्याच्या विकास प्रकल्पांना ताकद कोण देणार?

By संतोष भिसे | Updated: December 17, 2024 17:17 IST

आमदारांना कामांसाठी हेलपाटे मारावे लागणार, मंत्रिपद नसल्याचा फटका

संतोष भिसेसांगली : राज्यात भरभक्कम बहुमतासह सत्ता असूनही सत्तारूढ गटातील जिल्ह्यातील आमदारांच्या हाती सत्तासूत्रे उरलेली नाहीत. गेली पाच वर्षे दात्याच्या भूमिकेत राहिलेल्या लोकप्रतिनिधींना आता सामान्य आमदार म्हणून विकासकामांसाठी निधीचा पाठपुरावा करावा लागणार आहे. याचा प्रतिकूल परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या गतीवर होणार आहे.गेली दोन दशके जिल्ह्याने मंत्रिमंडळात नेहमीच वर्चस्व राखले होते. अनेकदा मंत्रिपद नसतानाही ज्येष्ठ अनुभवी आमदार आणि पक्षश्रेष्ठी म्हणूनही सत्तेमध्ये वर्चस्व राखले होते. त्याचा फायदा जिल्ह्याला वेळोवेळी झाला होता. प्रामुख्याने सिंचन योजना गतिमान होऊन जिल्ह्याचा आर्थिक गाडा धावता राहिला होता. सध्याच्या मंत्रिमंडळात मात्र चित्र नेमके उलटे आहे. महायुतीचे पाच आमदार असतानाही एकालाही मंत्रिपद मिळू शकलेले नाही. मंत्रिपद नसतानाही वर्चस्व गाजवू शकेल असे नेतृत्वही नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या झोळीत आमदार निधीशिवाय फार काही पडण्याची शक्यता नाही. अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडण्याची भीती आहे.

या प्रकल्पांवर परिणाम?म्हैसाळ योजनेच्या जत विस्तारित टप्प्याचे काम सध्या सुरू असले, तरी त्याला आणखी निधीची गरज लागणार आहे. तो आणण्यासाठी आता मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मिनतवाऱ्या कराव्या लागणार आहेत. जिल्ह्यात आयटी पार्कसाठी डॉ. पतंगराव कदम यांच्या मंत्रिपदाच्या काळापासून प्रयत्न सुरू होते. गेल्या टर्ममध्ये सुरेश खाडे यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतही त्याला चालना मिळाली होती. पुण्यातील काही आयटी कंपन्यांशी सकारात्मक चर्चा सुरू झाली होती. याला आता ‘खो’ बसणार आहे. मंत्रिपद नसल्याने ताकद कमी पडणार आहे. आमदारांना धोरणात्मक निर्णयाचे अधिकार नसल्याने आयटी कंपन्यांचा प्रतिसाद कितपत सकारात्मक असेल? हा प्रश्नच आहे.सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांवर नित्यनेमाने हल्ला करणाऱ्या महापुराला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे; पण जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने आता सर्व आमदारांना ताकद एकवटून पाठपुरावा करावा लागेल. म्हैसाळ सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी १४०० कोटी रुपयांच्या २०० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पात आहे, तो मार्गी लावण्यासाठी राज्याच्या कॅबिनेटमध्ये सांगलीचा कोणीही मंत्री नाही.

मागण्या करा, वाट पाहा

  • मंत्रिपदाच्या काळात राज्याच्या कॅबिनेटमध्ये जिल्ह्याचे जिल्ह्याचे प्रश्न दमदारपणे मांडून निर्णय होत होते.
  • आता मात्र आमदारांना आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंत्र्यांकडे हेलपाटे मारावे लागतील.
  • तीन प्रमुख पक्षांच्या सरकारमध्ये काही खाती विरोधी गटाकडे जातील, त्यांच्याकडून कामांना कितपत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, याबाबतही साशंकता आहे.
  • सांगलीच्या आमदारांना मागण्यांची फाइल ठेवून त्यावर निर्णय होण्याची वाट पाहत राहावे लागेल.
टॅग्स :SangliसांगलीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMLAआमदारministerमंत्री