शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता आहे; पण सत्तासूत्रे नाहीत, सांगली जिल्ह्याच्या विकास प्रकल्पांना ताकद कोण देणार?

By संतोष भिसे | Updated: December 17, 2024 17:17 IST

आमदारांना कामांसाठी हेलपाटे मारावे लागणार, मंत्रिपद नसल्याचा फटका

संतोष भिसेसांगली : राज्यात भरभक्कम बहुमतासह सत्ता असूनही सत्तारूढ गटातील जिल्ह्यातील आमदारांच्या हाती सत्तासूत्रे उरलेली नाहीत. गेली पाच वर्षे दात्याच्या भूमिकेत राहिलेल्या लोकप्रतिनिधींना आता सामान्य आमदार म्हणून विकासकामांसाठी निधीचा पाठपुरावा करावा लागणार आहे. याचा प्रतिकूल परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या गतीवर होणार आहे.गेली दोन दशके जिल्ह्याने मंत्रिमंडळात नेहमीच वर्चस्व राखले होते. अनेकदा मंत्रिपद नसतानाही ज्येष्ठ अनुभवी आमदार आणि पक्षश्रेष्ठी म्हणूनही सत्तेमध्ये वर्चस्व राखले होते. त्याचा फायदा जिल्ह्याला वेळोवेळी झाला होता. प्रामुख्याने सिंचन योजना गतिमान होऊन जिल्ह्याचा आर्थिक गाडा धावता राहिला होता. सध्याच्या मंत्रिमंडळात मात्र चित्र नेमके उलटे आहे. महायुतीचे पाच आमदार असतानाही एकालाही मंत्रिपद मिळू शकलेले नाही. मंत्रिपद नसतानाही वर्चस्व गाजवू शकेल असे नेतृत्वही नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या झोळीत आमदार निधीशिवाय फार काही पडण्याची शक्यता नाही. अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडण्याची भीती आहे.

या प्रकल्पांवर परिणाम?म्हैसाळ योजनेच्या जत विस्तारित टप्प्याचे काम सध्या सुरू असले, तरी त्याला आणखी निधीची गरज लागणार आहे. तो आणण्यासाठी आता मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मिनतवाऱ्या कराव्या लागणार आहेत. जिल्ह्यात आयटी पार्कसाठी डॉ. पतंगराव कदम यांच्या मंत्रिपदाच्या काळापासून प्रयत्न सुरू होते. गेल्या टर्ममध्ये सुरेश खाडे यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतही त्याला चालना मिळाली होती. पुण्यातील काही आयटी कंपन्यांशी सकारात्मक चर्चा सुरू झाली होती. याला आता ‘खो’ बसणार आहे. मंत्रिपद नसल्याने ताकद कमी पडणार आहे. आमदारांना धोरणात्मक निर्णयाचे अधिकार नसल्याने आयटी कंपन्यांचा प्रतिसाद कितपत सकारात्मक असेल? हा प्रश्नच आहे.सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांवर नित्यनेमाने हल्ला करणाऱ्या महापुराला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे; पण जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने आता सर्व आमदारांना ताकद एकवटून पाठपुरावा करावा लागेल. म्हैसाळ सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी १४०० कोटी रुपयांच्या २०० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पात आहे, तो मार्गी लावण्यासाठी राज्याच्या कॅबिनेटमध्ये सांगलीचा कोणीही मंत्री नाही.

मागण्या करा, वाट पाहा

  • मंत्रिपदाच्या काळात राज्याच्या कॅबिनेटमध्ये जिल्ह्याचे जिल्ह्याचे प्रश्न दमदारपणे मांडून निर्णय होत होते.
  • आता मात्र आमदारांना आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंत्र्यांकडे हेलपाटे मारावे लागतील.
  • तीन प्रमुख पक्षांच्या सरकारमध्ये काही खाती विरोधी गटाकडे जातील, त्यांच्याकडून कामांना कितपत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, याबाबतही साशंकता आहे.
  • सांगलीच्या आमदारांना मागण्यांची फाइल ठेवून त्यावर निर्णय होण्याची वाट पाहत राहावे लागेल.
टॅग्स :SangliसांगलीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMLAआमदारministerमंत्री