शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नऊ गावांचा दुष्काळ संपविला; पण डोर्लीच्या शेतकऱ्यांना सुकाळ नाही गवसला, सांगली जिल्ह्यातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 15:51 IST

पुनर्वसित गावाची कहाणी : ३५ वर्षांचा संघर्ष संपणार तरी कधी?

दत्ता पाटीलतासगाव : दुष्काळातल्या तब्बल नऊ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार म्हणून एका गावाने विस्थापित होण्याचं बलिदान दिले. तलावाच्या उभारणीने एकीकडे समृद्धीचे पाट वाहत असताना विस्थापित झालेल्या डोर्लीकरांना छप्परासाठी वाट पाहत बसावी लागली. प्रकल्पग्रस्त म्हणून ना नोकरी मिळाली, ना पक्की घरे, ना भौतिक सुविधा, ना सुसह्य जीवन. तीन तपांचा हा संघर्ष, वनवास संपणार तरी कधी, असा सवाल डोर्लीकरांमधून उपस्थित होत आहे.तब्बल ३५ वर्षांपूर्वी तासगाव तालुक्यातील चार गावांतील जमिनींचे लोढे तलावासाठी अधिग्रहण झाले. लोढे मध्यम प्रकल्प तलावासाठी १९८९मध्ये लोढे डोर्ली, कौलगे, आरवडे परिसरातील जमिनीचे अधिग्रहण झाले. या अधिग्रहणात डोर्ली गावातील तब्बल अडीचशे एकर जमीन अधिग्रहित झाली. इतकेच नव्हे तर डोर्ली गावठाणदेखील या तलावात गेले. या तलावामुळे डोर्ली गाव पूर्णपणे विस्थापित झाले.

विस्थापितांना त्यावेळी शासनाने जमिनीसाठी एकरी आठ हजार रुपये, तर घरांसाठी प्रति २५ चौरस फुटाला पंधराशे रुपये अशी तुटपुंजी मदत दिली. डोर्लीपासून काही किलोमीटर अंतरावर शासकीय जागेवर प्लॉट पाडून प्रत्येकी तीन गुंठ्यांचा प्लॉट दिला गेला. या प्लॉटसाठीची रक्कमही मिळालेल्या मदतीतून कपातच करून दिली.

शासनाने दिलेल्या तुटपुंज्या मदतीवर नवी डोर्लीमध्ये विस्थापितांनी झोपडीवजा घरे उभी केली. ती आता पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. ओढ्याकाठच्या कसदार जमिनी जाऊन झालेल्या तलावात पंचक्रोशीचे नंदनवन झाले. मात्र, जमिनी आणि घरे गेलेल्या डोर्लीकरांच्या नशिबी वनवास आला.

शासनाने दिलेले प्लॉट वर्ग दोनमध्ये समाविष्ट आहेत. प्रकल्पग्रस्त दाखले काढूनही कुचकामी ठरले आहेत. ३५ वर्षांत ना अंतर्गत रस्ते झाले, ना भौतिक सुविधा झाल्या. १०१ कुटुंबांना आज राहण्यासाठी घर नाही. त्यात अपवाद सोडला तर बहुतांश कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हे शेतमजुरीच आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण पूर्ण करायचं की घराचं स्वप्न साकार करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभारला आहे.

डोर्ली गाव विस्थापित झाल्यानंतर ४१ कुटुंबांनी प्रकल्पग्रस्त दाखले मिळवले. त्यापैकी अवघ्या सात जणांनाच आजअखेर नोकरी लागली. अनेकांचे वय संपून गेले आहे. शासनाने घरकुलाचा लाभ तातडीने देऊन, प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी किंवा त्या बदल्यात आर्थिक मोबदला तरी द्यावा. -हणमंत पाटील, पोलिस पाटील, डोर्ली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळHomeसुंदर गृहनियोजन