शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मरण; ‘रत्नागिरी-नागपूर’ असताना नव्याचे काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 11:58 IST

गुंठाभरही जमीन देणार नाही : सांगलीतील बैठकीत शेतकऱ्यांचा इशारा

सांगली : जिल्ह्यात रत्नागिरी-नागपूर महामार्ग पूर्ण झाल्याने शक्तिपीठसारख्या आणखी एका महामार्गाची गरज नाही. शक्तिपीठमुळे कित्येक एकर पिकाऊ शेतजमीन बाधित होऊन शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे. त्यामुळे नव्या महामार्गाला सर्वतोपरी व पूर्ण ताकदीने विरोध करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. यासंदर्भात मंगळवारी सांगलीत कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात बैठक झाली.

किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे व नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. विरोधाचा पुढील टप्पा म्हणून गुरुवारी (दि. ७) जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले.प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचे राजपत्र शासनाने प्रसिद्ध करताच तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. बागायती पिकांखालील जमिनी महामार्गासाठी जाणार असून, त्यासाठी पुरेसा मोबदला मिळणार नाही. सांगली जिल्ह्यातील घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी या गावांतील जमिनींचे संपादन होणार आहे. एकूण ११३५ गट क्रमांक बाधित होणार आहेत. सुमारे साडेचार हजार शेतकरी कुटुंबांना महामार्गाचा फटका बसणार आहे.

देशमुख म्हणाले, तीर्थस्थळे जोडायची असतील, तर शासनाने चारपदरी मार्ग करावा. शक्तिपीठमुळे काही शेतकरी भूमिहीन होण्याचे संकट आहे.खराडे म्हणाले, महामार्गासाठी गुंठाभर जमीनही देणार नाही. शक्तिपीठमधून पर्यटन वाढवायचे असेल, तर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करावीत. आमच्या द्राक्षपट्ट्यावर, ऊसपट्ट्यावर नांगर चालवू नये. यावेळी या गावांतील शेतकऱ्यांनीही भूमिका मांडली.

आजच्या बैठकीला अरविंद खराडे (तिसंगी), उदय पाटील, गजानन हारुगडे (सांगलीवाडी), विजय जगदाळे (पद्माळे), प्रवीण पाटील, दत्ता पाटील (सांगलीवाडी), योगेश पाटील (कवलापूर), महादेव नलावडे (कवलापूर), एकनाथ तोडकर, अण्णासाहेब जमदाडे, उमेश एडके (कर्नाळ) आदी शेतकरी उपस्थित होते. विरोधाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय बैठकीत झाला.

शक्तिपीठची गरजच काय?उद्योग विकासाऐवजी तीर्थस्थळे जोडणे, हा काही महामार्ग बनवण्याचा मुख्य हेतू असू शकत नाही. या प्रस्तावित महामार्गालाच समांतर असा रत्नागिरी-नागपूर महामार्ग झालेला असताना त्याला नव्याने शक्तिपीठची गरज नाही. सरकारने तीर्थस्थळे जोडण्याऐवजी विकास प्रकल्पांचा उद्देश ठेवावा. जमिनी घेऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर आणू नये. अन्यथा न्यायालयात आव्हान द्यावे लागेल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

महामार्गाऐवजी शुद्ध पाणी, विमानतळ द्यासतीश साखळकर म्हणाले, जिल्ह्याला सध्या आणखी एका महामार्गाऐवजी विमानतळ, शुद्ध पाणी, ड्रायपोर्ट यांची गरज आहे. शासनाने या मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवून महामार्गाचे हानिकारक टुमणे काढू नये.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी