शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

जत तालुक्यात पावसाची दडी - खरीप हंगाम वाया : जनावरांच्या चाऱ्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 9:14 PM

पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकºयांना यंदा पुन्हा दुष्काळास सामोरे जावे लागणार आहे.

गजानन पाटीलसंख : पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकºयांना यंदा पुन्हा दुष्काळास सामोरे जावे लागणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांच्या चाºयासाठी भटकंती करावी लागते की काय? या चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे. खरिपातील पिके वाया गेल्यामुळे मजुरांवर उपासमारीचे संकट आले आहे.ऐन पावसाळ्यात फक्त जोराचा वारा वाहू लागल्यामुळे जमा झालेले ढग वाºयाने गायब होत आहेत. गेल्यावर्षी पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिके चांगली आली होती. यंदा आतापर्यंतची सर्व नक्षत्रे कोरडी गेली आहेत. खरीप हंगामात पेरलेली पिके कोमेजली आहेत. खरीप हंगामातील बाजरी हे प्रमुख पीक आहे. या हंगामात सूर्यफुल, मका, तूर, हुलगा, मटकी, मूग, भुईमूग, उडीद या पिकांची पेरणी केली जाते.

खरीप हंगामामध्ये एकूण क्षेत्र ६२ हजार २०० हेक्टर आहे. त्यामध्ये बाजरी ३७ हजार हेक्टर, मका १ हजार ३५०, तृणधान्ये ३९ हजार १०० हेक्टर, इतर कडधान्यांचे १६ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये मूग १९८० हेक्टर, उडीद १००० हेक्टर, भुईमूग २ हजार २०० हेक्टर, सूर्यफूल २१५८० हेक्टर, सोयाबीन २००० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात.

यावर्षी सुरुवातीपासून पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्यानंतरही शेतकºयांनी खरिपाची पेरणी मोठ्या जोमाने केली आहे. तालुक्यात यंदा ४५ हजार ९८१ हेक्टर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित होते; पण त्यापेक्षा जास्त म्हणजे ५० हजार ४५३ हेक्टर पेरणी झाली आहे. शेतकºयांनी मोठ्या आशेने पेरणी केली, पण त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

गवताची उगवण नाही : पशुधन संकटातपावसाने हुलकावणी दिल्याने रानात, डोंगरात, बांधावर खुरट्या गवताची उगवण झालेली नाही. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैशी ही दुभती जनावरे संकटात सापडली आहेत.द्राक्षे, डाळिंबाला फटका द्राक्षबागांच्या छाटण्या घेण्याचा कालावधी जवळ आला आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छाटण्या होतात. परंतु अजूनपर्यंत पाऊसच झाला नसल्याने द्राक्ष छाटण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. तसेच डाळिंब बागांचा भर धरण्याचा कालावधी आहे. पण पावसाळा संपत आला तरी सुद्धा विहिरी, कूपनलिका, तलावांना पाणीच आले नाही. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब, फळबागा दुष्काळाच्या संकटात सापडल्या आहेत.

ओढे, तलाव कोरडेचजून, जुलै, आॅगस्ट महिन्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला नाही. तलाव, ओढ्यांना पाणी आले नाही. भूमिगत पाण्याची पातळी कमी झाली आहे. तालुक्यातील ११ तलावांतील पाणीसाठा मृतसंचय पातळीखाली आहे. १ तलाव कोरडा पडला आहे. पाणीसाठा ९४२.८६ दशलक्ष घनमीटर आहे. टक्केवारी फक्त १३ टक्के इतकी आहे. माडग्याळ, व्हसपेठ, कुणीकोणूर, लमाणतांडा (दरीबडची), गिरगाव या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथे टॅँकरची मागणी केली आहे. 

९८ मि.मी. पावसाची नोंदतालुक्यामध्ये वार्षिक पर्जन्यमान ४५७.७० मि.मी. आहे. मागील तीन महिन्यात तालुक्यात ९८.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यमानाची टक्केवारी ३५.८६ आहे. तालुक्यात मेमध्ये २.५० मि.मी., जूनमध्ये ८२.६३ मि.मी., जुलै महिन्यात १२.१३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पेरणी अहवाल (हेक्टरमध्ये)पीक क्षेत्रबाजरी १९४०१मका ९२२१तूर ५०३२मूग २६६५उडीद ७९४९मटकी ३३३२हुलगा ५७७अन्य पिके २२७६तालुक्यातील तलाव, मध्यम प्रकल्प पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)प्रकल्प संख्या पाणीसाठा टक्केवारी कोरडे२८ ९४२.८६ १३ टक्के १- जून ते आजअखेरचा पाऊस (मिलिमीटर)२०१८ २०१७९८.८ १४७.७

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस