शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 11:53 IST

भाजपच्या नेत्यांनी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांवर उमेदवारी लादली

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांना जिल्ह्यात तिसरे नेतृत्वच निर्माण होऊ द्यायचे नाही. म्हणूनच ते नेहमी भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याबरोबर सेटलमेंटचे राजकारण करीत आहेत, अशी टीका भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. तसेच सर्वेक्षण, जनमत चाचणीतही संजय पाटील उमेदवारीला विरोध होता, तरीही भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांची उमेदवारी कार्यकर्ते आणि नेत्यांवर लादली आहे, असाही त्यांनी आरोप केला.विलासराव जगताप म्हणाले, जयंत पाटील आणि डॉ. विश्वजित कदम राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या जिल्ह्यात सक्षम आहेत. या दोन नेत्यांनी ठरविले तर जिल्ह्यात भाजपच्या उमेदवाराला तुल्यबळ उमेदवार देऊ शकतात, पण पाटील आणि कदम यांना राजकारणात तिसरा पर्यायच निर्माण करायचा नाही. म्हणूनच ते भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याशी सेटलमेंटचे राजकारण करून त्यांना निवडून आणत आहेत.जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. डॉ. विश्वजित कदम यांचेही काँग्रेसमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. असे असतानाही त्यांना सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडावी लागत आहे. काँग्रेससाठी उमेदवारी मिळवता येत नाही, ही गोष्ट मतदारांच्या डोळ्यात धूळफेक केल्याप्रमाणे आहे. मतदारांनी नेत्यांचा सेटलमेंटचा उद्योग बंद पाडण्यासाठी डोळसपणे मतदान करण्याची गरज आहे, असेही त्यांनी मतदारांना आवाहन केले.

दुष्काळी फोरमशी चर्चा करून निर्णय घेणार

दुष्काळी फोरममधील सर्वच नेत्यांनी संजय पाटील यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. सध्या कोणीही स्पष्ट बोलत नसले तरी मतदानातून ते दाखवून देतील. अन्य कोणत्या उमेदवाराला मदत करायची, याबद्दलचा निर्णय दुष्काळी फोरमच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, असेही जगताप म्हणाले.

भाजपमध्ये राहूनच संजयकाकांना विरोधमला सध्या खासदार, आमदार काहीच व्हायचे नाही. भाजपमध्ये राहूनच संजय पाटील यांच्या पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला विरोध करणार आहे. स्पष्ट बोलल्याबद्दल पक्षाने माझ्यावर कारवाई केली तर कुठे जायचे याबाबतची भूमिका योग्यवेळी जाहीर करण्यात येईल, असेही जगताप म्हणाले.

जयंतरावांचा दोनवेळा मुलांसाठीच सर्व्हे

जयंत पाटील यांनी चिरंजीव प्रतीक पाटील यांना सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरविण्यासाठी सर्वेक्षण केले. या ठिकाणी दुसरे नेतृत्व तयार व्हावे, असे त्यांना वाटतच नाही. प्रत्येक ठिकाणी घराणेशाहीचे राजकारण चालू आहे, अशी टीका जगताप यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.

संजय पाटील यांची प्रत्येकवेळी भाजपशी गद्दारीभाजपचे खासदार असतानाही संजय पाटील यांनी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती पदाधिकारी निवडीवेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी गद्दारी करून राष्ट्रवादीशी तडजोड केली. सांगली बाजार समिती निवडणुकीतही संजय पाटील यांनी भाजपशी गद्दारी केली. तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे, अशी टीका जगताप यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस