शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माहिती अधिकाराचा वापर जिरवाजिरवी आणि ब्लॅकमेलिंगसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:41 IST

प्रशासनातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याऐवजी ब्लॅकमेलिंगसाठीच अधिक वापर

संतोष भिसेसांगली : माहिती अधिकाराद्वारे प्रशासनातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याऐवजी ब्लॅकमेलिंगसाठीच अधिक वापर होत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात दहा पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद मुख्यालयाकडे माहिती अधिकाराचे सरासरी १०० अर्ज प्रत्येक महिन्याला दाखल झाले, यातील बहुतांश अर्ज विशिष्ट विभागाकडेच आले आहेत.माहितीची विचारणा होण्यात बांधकाम विभाग आघाडीवर आहे. शिवाय ग्रामपंचायत, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, सामान्य प्रशासन, समाजकल्याण या विभागांकडेही अर्जांची संख्या मोठी आहे. यातील बहुतांश अर्जांचा हेतू स्वच्छ नसल्याचे आढळले आहे. उत्तरे निर्धारित वेळेत दिली जातात, पण यासाठी प्रशासनाचा कामाचा बहुमोल वेळ खर्ची पडतो.१९८५ पासूनच्या माहितीची विचारणाएका ग्रामपंचायतीकडे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याने १९८५ पासूनची माहिती मागितली. ग्रामपंचायतीने कर्मचारी कामाला लावून माहिती संकलित केली. तिच्या झेरॉक्स प्रतींचा खर्च १८ हजार रुपयांवर गेला. पैसे भरण्याचे पत्र अर्जदाराला दिले, पण, त्याने पैसे भरलेच नाहीत. ग्रामपंचायतीकडेही फिरकला नाही. पण, या उठाठेवीत प्रशासनाचा वेळ खर्च पडला. नाहक मनस्तापही झाला.

जिरवाजिरवीच अधिकबांधकाम विभागात कामे मिळविण्याच्या स्पर्धेत अर्जाचा वापर हत्यारासारखा होत आहे. निविदा प्रक्रिया, गुणवत्ता, अंदाजपत्रक आदींविषयी सातत्याने अर्ज येतात. गतिमान आणि पारदर्शक प्रशासन हा माहिती अधिकार कायद्याचा हेतू आहे. पण, अधिकाऱ्यांची जिरवाजिरवी आणि ब्लॅकमेलिंगसाठीच अधिक वापर होत असल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या वर्षातील अर्ज असे- अर्ज - १ हजार २८५- निकाली - १ हजार २३३- उत्तरे दिलेले - १ हजार २२५- माहिती नाकारलेले - ८- पंचायत समित्यांकडे अर्ज - ७३३- जिल्हा परिषदेकडे - ५५२- गावस्तरावरुन पंचायत समितीकडे अपिल ३६५- जिल्हा परिषदेकडे अपिल १४७ 

वर्षभरातील बहुतांश अर्ज निकाली काढले आहेत. निर्धारित कालावधीत अर्जांना उत्तरे दिली जातात. अपिलासाठी आलेले अर्जही वेळेत निकाली काढले आहेत. - राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा परिषद

माहिती अधिकाराची ताकद मोठी असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेरीस आणता येते. कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे याद्वारे बाहेर काढली आहेत. पण, त्याच्या गैरवापराची उदाहरणेही समोर येत आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पैसे उकळण्यासाठीही वापर होत आहे. यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची बदनामी होते. यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा निर्माण व्हायला हवी. - सुरेश हराळे, माहिती अधिकार चळवळ कार्यकर्ता

टॅग्स :SangliसांगलीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता