शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद  : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 4:53 PM

या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.

ठळक मुद्देइस्लामपूरला ‘स्वाभिमानी’च्या पदाधिका-यांशी बैठक

सांगली : ऊस दराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे, उपाध्यक्ष वसंतराव सुतार, महेश जगताप, भरत चौगुले यांनी सोमवारी जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन दराचा तोडगा निघेपर्यंत कारखान्यांचे गळीत हंगाम बंद ठेवण्याची मागणी केली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.

प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ऊस दराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. संघटनेची ऊस परिषद दि. २३ रोजी आहे. ऊस परिषदेत दराची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊस दराचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आपण पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद ठेवावेत, अशी विनंती त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली होती.

...तर तोडी बंद पाडू, वाहतूक रोखणार : खराडेऊस दराचा तोडगा निघाला नाही, तोपर्यंत कारखानदारांनी गळीत हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखानदारांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय तोडी सुरू ठेवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्या तोडी बंद पाडण्यात येतील. तसेच ऊस वाहतूक वाहने रोखण्यात येणार आहेत. वाहनांची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी कारखानदार व राज्य सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखाने