शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

प्रवासी-मालवाहतूक रिक्षा धडकेत दोघे ठार

By घनशाम नवाथे | Published: April 25, 2024 8:28 PM

बुधगावात अपघात; मालवाहू रिक्षा चालकाविरूद्ध गुन्हा

घनशाम नवाथे/ सांगली : बुधगाव ते बिसूर ऱस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने धडक दिल्यामुळे अश्विनी शीतल पाटील (वय ३२, रा. सिद्धेश्वर मंदिरजवळ) आणि राघव रमेश पाटील (वय १ वर्षे) ठार झाले. मृत दोघे मामी आणि भाचा आहेत. बुधवारी, दि. २४ रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रिक्षा चालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षा चालक महेश शिवाजी ओंकारे (रा. बिसूर) याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधगावचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वराची यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे पै-पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. बुधवारी रात्री रिक्षा चालक अरविंद पवार याच्या रिक्षा (एमएच १० के ४९५२) मधून शेजारील ललिता ज्ञानदेव पाटील, कावेरी रमेश पाटील, पौर्णिमा शैलेंद्र सावंत, सारिका शेखर पाटील, अश्विनी शीतल पाटील व चार ते पाच लहान मुले जेवण करण्यासाठी बिसूर ते कवलापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते.

रात्री दहाच्या सुमारास जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परत येत होते. तेव्हा बुधगावहून बिसूरकडे तीन चाकी मालवाहतूक रिक्षा (एमएच १० सीक्यू २७६८) येथे होती. परंतू या मालवाहतूक रिक्षाला हेडलाईट नव्हता. या रिक्षाने प्रवासी रिक्षाला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत प्रवासी रिक्षा उलटली. आतील पाच महिला व स्वरा रमेश कोकाटे, समृद्धी शैलेंद्र सावंत, जयदीप शेखर पाटील, अवधूत शैलेंद्र सावंत, राघव पाटील ही मुले जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू दुर्दैवाने अश्विनी पाटील आणि राघव पाटील हे दोघेजण मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बुधगाव-बिसूरवर शोककळा

मृत अश्विनी हिचा वर्षापूर्वी विवाह झाला होता. तर चिमुकल्या राघवच्या जावळाचा कार्यक्रम नुकतेच झाला होता. बुधगावला सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कुटुंबिय एकत्र आले होते. अपघातामध्ये मामी आणि चिमुकल्या भाच्याचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही गावात शोककळा पसरली आहे.

रिक्षात चालकासह ११ जण-ज्या प्रवासी रिक्षाचा अपघात झाला, त्यामध्ये पाच महिला आणि पाच मुले असे चालकासह ११ जण बसले होते. अपघातानंतर काही बाहेर फेकले गेले तर काही आत अडकले. अपघातानंतर अंधारात गोंधळ उडाला होता

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूSangliसांगली