शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

मसुचीवाडी छेडछाडीतील तिघांना दीड वर्षे कारावास-सडकसख्याहरी बोरगावचे : राज्यभर गाजले होते प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 21:35 IST

गेल्या दोन वर्षापूर्वी राज्यभर गाजलेल्या मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अल्पवयीन शाळकरी मुलींच्या छेडछाड प्रकरणातील बोरगावच्या तिघा सडकसख्याहरींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरुन विविध

इस्लामपूर : गेल्या दोन वर्षापूर्वी राज्यभर गाजलेल्या मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अल्पवयीन शाळकरी मुलींच्या छेडछाड प्रकरणातील बोरगावच्या तिघा सडकसख्याहरींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरुन विविध कलमांखाली १८ महिन्यांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली.

इंद्रजित ऊर्फ बंटी ऊर्फ रोहित प्रकाश खोत (वय २३), संग्राम ऊर्फ सागर प्रकाश खोत (२६) आणि अमोलसिद्ध ऊर्फ आप्पासाहेब नरसाप्पा बबलेश्वर (२४, तिघे रा. आण्णाचा मळा, मसुचीवाडी रोड, बोरगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या गाजलेल्या आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या खटल्यात फिर्यादीतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी विक्रम पाटील यांनी काम पाहिले.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील १७ वर्षीय पीडित मुलगी ही आपला भाऊ आणि अन्य एका मैत्रिणीसमवेत इस्लामपूर येथे शिक्षणासाठी येत होती. हे तिघे दररोज मसुचीवाडी ते इस्लामपूर व परत असा बसने प्रवास करायचे. फेब्रुवारी २०१६ मध्ये एक दिवस मसुचीवाडी गावी जाणारी बस निघून गेल्याने हे तिघे बोरगावपर्यंत आले.

तेथे उतरल्यावर वडिलांना फोन करुन आम्हाला न्यायला या, असा निरोप देऊन ही पीडित मुलगी, तिचा भाऊ आणि मैत्रीण मसुचीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने चालत निघाले. गावापासून पुढे एक किलोमीटर अंतरापर्यंत चालत जात असताना बोरगाव हायस्कूलजवळ आल्यावर रोहित खोत, सागर खोत, आप्पा बबलेश्वर आणि राजेंद्र पवार असे चौघे दोन मोटारसायकलवरुन पाठीमागून आले. बबलेश्वर याने दुचाकी आडवी मारुन पीडित मुलीजवळ उभी केली. यावेळी पाठीमागे बसलेल्या रोहित खोत याने चल माझ्या गाडीवर बस, असे म्हणत मुलीचा हात धरुन जबरदस्तीने गाडीवर बसवू लागला. पीडित मुलीने विरोध केल्यावरही त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. भाऊ व मैत्रिणीला धमकावले. यानंतर या टोळक्याने पुन्हा ही पीडित मुलगी ज्या बसने प्रवास करायची, तिचा पाठलाग करु लागले. हा प्रकार मुलीने वडिलांना सांगितला. त्यांनी तिची समजूत काढली.

या संवेदनशील ठरलेल्या खटल्यात न्यायालयाने तिघा आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावली. कलम ३५४, ३५४ (अ) आणि ३५४ (ब) नुसार १८ महिने सक्षम कारावास आणि प्रत्येकी ६ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास २१ दिवस सश्रम कारावास. कलम ५०६ नुसार ६ महिने सश्रम कारावास प्रत्येकी ५०० रुपये दंड, दंड न दिल्यास ७ दिवस सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम १२ नुसार १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस सश्रम कारावास अशा शिक्षेचा समावेश आहे. तिघांना ही शिक्षा एकत्रितपणे भोगावी लागणार आहे. गुन्'ातील जप्त मोटारसायकल सरकारजमा करावी. तसेच यातील चौथा फरारी संशयित राजेंद्र पवार याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

 

टॅग्स :Sangliसांगलीcrimeगुन्हे