शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

मागणी नसल्यामुळे साडेबारा हजार किलो बियाणे कंपन्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:11 PM

सांगली जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील पेरणीसाठी ४७ हजार ३७२ क्विंटल बियाणे आणि एक लाख २५ हजार ७१० टन खताची मागणी केली होती. जवळपास दीड लाख हेक्टवर पेरणीच झाली नसल्यामुळे कृषी दुकानदारांनी बारा हजार ४५६ किलो बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले आहे. तसेच जिल्ह्यात एक लाख टन रासायनिक खत मागणी नसल्यामुळे शिल्लक आहे.

ठळक मुद्देसाडेबारा हजार किलो बियाणे कंपन्यांना परतमागणी नसल्यामुळे जिल्ह्यात एक लाख टन रासायनिक खत शिल्लक

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील पेरणीसाठी ४७ हजार ३७२ क्विंटल बियाणे आणि एक लाख २५ हजार ७१० टन खताची मागणी केली होती. जवळपास दीड लाख हेक्टवर पेरणीच झाली नसल्यामुळे कृषी दुकानदारांनी बारा हजार ४५६ किलो बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले आहे. तसेच जिल्ह्यात एक लाख टन रासायनिक खत मागणी नसल्यामुळे शिल्लक आहे.जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्र आहे. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयाबीनचे १७ हजार १४८ क्विंटल, ज्वारी सहा हजार ८७ क्विंटल, बाजरी एक हजार ६५२ क्विंटल, तूर ५१९ क्विंटल, तर मका पाच हजार ३२६ क्विंटल अशा एकूण ४८ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली होती. त्यानुसार बियाणांचा पुरवाठाही झाला. पण, कृषी दुकानदारांनी मागणीच नसल्यामुळे बारा हजार ४५६ क्विंटल बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले.

सध्या जिल्ह्यात एक हजार ८०२ क्विंटल बियाणे कृषी दुकानदारांकडे शिल्लक आहे. दुकानदारांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दुष्काळामुळे बियाणे विक्री थंडावली असल्याचे सांगितले.

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एक लाख सहा हजार ४७२ मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे केली आहे. त्यात युरिया २० हजार ९४५ टन, डीएपी १७ हजार ८०९ टन, एमओपी २० हजार ३६५ टन, एसएसपी १९ हजार १७२ टन, एनपीके २८ हजार १८१ टन, तर मिश्रखते ५ हजार टन अशी मागणी केली होती. यापैकी एक लाख आठ हजार ६०८ टन खताचा पुरवठा झाला आहे.

या रासायनिक खतालाही जिल्ह्यात फारशी मागणी नाही. वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज पश्चिम भागामध्येच रासायनिक खताचा पुरवठा होत आहे. उर्वरित पाच दुष्काळी तालुक्यातून मागणी नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली