शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

ताकारी योजनेचे तिसरे आवर्तन उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST

कडेगाव : ताकारी सिंचन योजनेचे तिसरे आवर्तन गुरुवार, २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. हे आवर्तन १० जूनपर्यंत चालू राहणार ...

कडेगाव : ताकारी सिंचन योजनेचे तिसरे आवर्तन गुरुवार, २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. हे आवर्तन १० जूनपर्यंत चालू राहणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात १५ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील पिकांना दिलासा मिळणार आहे.

चालू वर्षी १ डिसेंबरपासून १३ जानेवारी या कालावधीत ‘ताकारी’चे ४३ दिवसांचे पाहिले आवर्तन देण्यात आले होते. त्यानंतर २० फेब्रुवारीपासून २ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत ४२ दिवसांचे आवर्तन देण्यात आले. आता २२ एप्रिलपासून १० जूनपर्यंत ५० दिवसांचे आवर्तन चालणार आहे.

ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील

शेतकऱ्यांना ८१/१९ फॉर्म्युल्याप्रमाणे एकरी ६१७२ रुपये पाणीपट्टी आकारणी केली जाते. २७ हजार ४३० हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या या योजनेचे १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

उर्वरित क्षेत्र वितरिका आणि बंदिस्त जलवाहिनीची काही कामे अपूर्ण असल्यामुळे ओलिताखाली आलेले नाही. हे उर्वरित लाभक्षेत्रही लवकरच ओलिताखाली येणार आहे. योजनेच्या वितरिका क्रमांक २ चे काम पूर्ण होऊन पाणीपूजनही झाले. यामुळे आता कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी तसेच पलूस तालुक्यातील कुंडलचा काही भाग व कोयना वसाहत तसेच पलूस व आंधळी आदी गावांच्या २४०४ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळणार आहे.

चौकट

पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक

सोनहिरा साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून वसूल केलेल्या पाणीपट्टीची १ कोटी ५० लाख, तर उदगिरी शुगर्स कारखान्याने ६५ लाखांची रक्कम योजनेकडे जमा केली आहे. याशिवाय क्रांती कारखान्याने ७२ लाखांचा धनादेश दिला आहे. एकूण ६ कोटी ७२ लाख रुपये इतकी उच्चांकी पाणीपट्टी वसुली झाली आहे.