शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापुरात महापूर नाही, ही शासनाची भूमिका - विशाल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:26 IST

महापुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यासाठी बोगद्याचा पर्याय

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापुरात महापूर येत नाही, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या स्थितीत महापुराच्या अन्य कारणांचा शोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत केले. महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी कालव्यांचा पर्यायच व्यवहार्य नाही, त्यासाठी बोगदा किंवा अन्य उपायांचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.खासदार पाटील म्हणाले, महापुराच्या कारणांच्या अभ्यासासाठी शासनाने वडनेरे समिती नेमली होती. समितीने अहवालात अलमट्टी धरणाला क्लिन चिट दिली आहे. हा अहवाल शासनाला मान्य आहे का ? असा प्रश्न आहे. अलमट्टीमुळे महापूर येत नाही अशी शासनाची भूमिका असल्यास नेमक्या कोणत्या कारणामुळे महापूर येतो? तो येऊ नये, म्हणून कोणती पर्यायी व्यवस्था शासनाने केली आहे? यंदा पूर आल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण ?, महापुराला जबाबदार नक्की कोण आहे?, असेही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.

ते म्हणाले, वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटक राज्यासाठी पोषक आहे. अलमट्टीमुळे महापूर येतो हे पुराव्यासह मांडण्यास महाराष्ट्र सरकार कमी पडले. वडनेरे समितीच्या अहवालाविरोधात शासनाने न्यायालयाचा दरवाजा अद्याप ठोठावलेला नाही. याचा अर्थ शासनाला तो मान्य आहे. अलमट्टीविरोधात भांडण्यात शासनाची भूमिका महत्त्वाची आहे. त्याची उंची वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. समितीचा अहवाल आम्हाला नाही. अलमट्टीमुळेच महापूर येतो, अशी पूरपट्ट्यातील नागरिकांची भावना आहे. त्यामुळे शासनाने समितीचे पुनर्गठन करावे.अहवाल पुन्हा घ्यावा. महापुराला कर्नाटक जबाबदार की महाराष्ट्र? हेदेखील जाहीर करावे.पाटील म्हणाले, महापूर आल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी तो येऊच नये, यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. पावसाळ्यात कोयनेतून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे नदीच्या पाण्यात वाढ होते. पूरपट्ट्यातील बांधकामे हीदेखील समस्या आहे.खासदार पाटील म्हणाले, महापुराचे पाणी ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांद्वारे मराठवाड्याकडे वळवणे शक्य नाही. महापुराचे एक टक्का पाणीदेखील या योजना उचलू शकत नाहीत. त्याऐवजी कोयनेपासूनच बोगदा काढायला हवा. त्यातून पाणी माण खोऱ्यात न्यावे. केंद्रीय जल आयोगापुढे अलमट्टीविरोधात बाजू मांडण्यात महाराष्ट्र शासन कमी पडले. धरणात पाणीसाठा करण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली नाही. महाराष्ट्र शासनाने रुरकी आयआयटी किंवा सबळ पुराव्यासह कर्नाटक शासनापुढे जायला हवे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणfloodपूरvishal patilविशाल पाटील