शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

...तर सिंचन योजना ‘बीओटी’वर चालवा

By admin | Updated: April 7, 2015 01:16 IST

विलासराव जगताप : तातडीने पुरेसा निधी मिळवून देण्याची मागणी

सांगली : म्हैसाळसह जिल्ह्यातील अन्य सिंचन योजनांना पुरेसा निधी देण्याची गरज आहे. शासनाच्या बजेटमध्ये करण्यात आलेली तरतूद कमी आहे. त्यामुळे वाढीव तरतूद शासनाने करावी. निधीची अडचण असेल तर ‘बीओटी’ (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर तरी या योजना चालवाव्यात, अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, सिंचन योजनांबाबत मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, अर्थमंत्री अशा सर्वांकडे आम्ही पत्राद्वारे निधीची मागणी केली आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात सध्या करण्यात आलेली तरतूद पुरेशी नाही. तरतूद केलेल्या रकमेपेक्षा अधिकची ठेकेदारांची देणीच आहेत. त्यामुळे योजना पूर्ण करून क्षमतेने चालविण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. राज्य शासन निश्चितपणे आम्हाला निधी देईल, अशी अपेक्षा आहे. निधीची काही अडचण असेल तर या योजना खासगी तत्त्वावर चालविण्यात याव्यात, अशीही मागणी करू. योजना कार्यान्वित राहणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात दिलेल्या पत्रावर युतीच्या जिल्ह्यातील पाचही आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही एकत्रित यासाठी प्रयत्न करीत आहोत. एआयबीपी (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) केंद्र शासनाने बंद केली आहे. त्यामुळे राज्य शासनालाच यासाठी तजवीज करावी लागेल. केंद्र शासनाकडून नवी कोणती योजना जाहीर होणार, याची कल्पना नाही, परंतु तोपर्यंत आवश्यक निधी देऊन योजना सुरू करणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)

जागा जास्त हव्यात
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जागावाटप करताना जत तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे. कमी गावांची संख्या असलेल्या पलूस आणि कडेगावला एकीकडे चार जागा मिळत असताना १२३ गावांच्या जत तालुक्यावर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करीत गावांच्या संख्येचा आणि मतदारसंघाचा विचार जागावाटपात व्हावा, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली.


पदे नको, कामे करा
मंत्रिमंडळ विस्तार किंवा महामंडळाच्या वाटपात कोणत्याही अपेक्षा नाहीत. लोकांचे जे प्रश्न मांडत आहोत ते सोडवावेत, एवढीच अपेक्षा असल्याचे जगताप म्हणाले.