शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Almatti Dam: अलमट्टीतून विसर्ग वाढवला तरच पूरपरिस्थिती उतरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:51 IST

अलमट्टी धरणात किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे.

सांगली : अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी जलसंपदा विभागाने समन्वय ठेवला आहे, मात्र धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात धरणातून विसर्ग केला जात नसल्याचे निरीक्षण महापूर नियंत्रण  नागरी कृती समितीने नोंदविले आहे. सध्या दोन लाख क्युसेक पाणी सोडले जात असून आणखी किमान ७५ हजार क्युसेक सोडण्याची मागणी केली आहे.अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने समन्वय ठेवला असून स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत धरणातील साठ्यावर लक्ष ठेवले जात आहे. धरणातील आवक आणि विसर्गामध्ये समन्वयासाठी पाठपुरावा केला जात आहे. यादरम्यान, समितीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून, अलमट्टीतून विसर्ग वाढविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती असून कोयना, चांदोली धरणातूनही पाणी सोडले जात आहे. त्याद्वारे अलमट्टीमध्ये किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग  सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे. राजापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा निचरा गतीने होण्यासाठी अलमट्टीतून किमान २ लाख ७५ हजार क्युसेक गतीने विसर्ग आवश्यक आहे.

कृष्णेची फूग वाढणार अलमट्टीत सध्या १११.६४४ टीएमसी साठा आहे. तो कायम ठेवण्यासाठी विसर्ग दोन लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. पण कृष्णेतून धरणात येणारे पाणी पाहता तो वाढविण्याची गरज आहे. कोयनेतील विसर्ग शुक्रवारी सकाळी वाढवला जाणार आहे, त्यामुळे कृष्णेची फूग वाढणार आहे. अलमट्टी धरणातील पाण्यावर  लक्ष ठेवण्यासाठी पाटबंधारेने निवृत्त अभियंत्याची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरDamधरणWaterपाणी