शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

म्हैसाळ योजनेचे पाणी उशाला, अन् कोरड घशाला!, ११०० हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:42 IST

१६ एप्रिल १९८४ साली म्हैसाळ योजना मंजूर झाली. त्यानंतर या योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांना मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुके ही आता या योजनेचा लाभ घेत आहेत.

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ योजनेमुळे म्हैसाळचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजले गेले. इतकेच काय तर या योजनेचे पाणीसांगली जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्या पर्यंत पोहचले. मात्र म्हैसाळ योजनेच्या उशालाच असणाऱ्या आरग, बेडग, नरवाड, लक्ष्मीवाडी या भागातील ११०० हेक्टर शेतीला पाणी नसल्याने म्हैसाळ योजना उशाला अन कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांच्यावर आली आहे.म्हैसाळ योजनेपासून जवळच असणाऱ्या या चार गावातील ११०० हेक्टर क्षेत्राला या योजनेच्या पाण्याची आवश्यकता आहे. १६ एप्रिल १९८४ साली म्हैसाळ योजना मंजूर झाली. त्यानंतर या योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांना मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुके ही आता या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतू जा भागातून हे पाणी जाते त्या भागातील काही शेतकरीच या योजनेपासून वंचित आहेत.सदर योजनेचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना मिळाल्यास मिरज तालुक्यातील आरग येथील ५३१ हेक्टर,बेडग मधील २६४ हेक्टर, नरवाड मधील १६६ हेक्टर व लक्ष्मीवाडी येथील १३९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याचा फायदा ऊस व द्राक्ष शेतीला होऊन या परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कोट्यवधी रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही योजना सुरू करण्यासाठी स्थापत्य विभागातील पंपग्रह व विहीर बांधणी, उध्र्वगामी नलिका, वितरण हौद व वितरण प्रणाली, यांत्रिक काम, विद्युत काम, बेडग कालवा येथे पंपग्रह उभा करून १८०० मीटर लांबीची नलिका व वितरण हौद इत्यादी कामे होण्याची गरज आहे. यासाठी अंदाजे १७ कोटी २७ लाख इतका खर्च येण्याची शक्यता आहे.

मिरज पूर्व भागातील भागातील ११०० हेक्टर क्षेत्राला पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याविना नुकसान होत आहे. सदरच्या प्रश्नां बाबत वरीष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून लवकर ही योजना म्हैसाळ प्रकल्पात समाविष्ट करण्याची विनंती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे करणार आहे. - मनोज शिंदे-म्हैसाळकर, सदस्य -कृष्णा कोयना योजना जलसिंचन समिती 

या कामाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी दीड वर्षा पूर्वी पाठवला आहे. पहिला हे काम म्हैसाळ योजनेच्या प्रकल्पात सामाविष्ट होणे गरजेचे आहे. त्यानंतर कामास सुरुवात होईल. काम होण्यास वेळ लागत नाही. - सुर्यकांत नलवडे, म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता -सांगली

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणी