शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

म्हैसाळ योजनेचे पाणी उशाला, अन् कोरड घशाला!, ११०० हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:42 IST

१६ एप्रिल १९८४ साली म्हैसाळ योजना मंजूर झाली. त्यानंतर या योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांना मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुके ही आता या योजनेचा लाभ घेत आहेत.

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ योजनेमुळे म्हैसाळचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजले गेले. इतकेच काय तर या योजनेचे पाणीसांगली जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्या पर्यंत पोहचले. मात्र म्हैसाळ योजनेच्या उशालाच असणाऱ्या आरग, बेडग, नरवाड, लक्ष्मीवाडी या भागातील ११०० हेक्टर शेतीला पाणी नसल्याने म्हैसाळ योजना उशाला अन कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांच्यावर आली आहे.म्हैसाळ योजनेपासून जवळच असणाऱ्या या चार गावातील ११०० हेक्टर क्षेत्राला या योजनेच्या पाण्याची आवश्यकता आहे. १६ एप्रिल १९८४ साली म्हैसाळ योजना मंजूर झाली. त्यानंतर या योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांना मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुके ही आता या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतू जा भागातून हे पाणी जाते त्या भागातील काही शेतकरीच या योजनेपासून वंचित आहेत.सदर योजनेचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना मिळाल्यास मिरज तालुक्यातील आरग येथील ५३१ हेक्टर,बेडग मधील २६४ हेक्टर, नरवाड मधील १६६ हेक्टर व लक्ष्मीवाडी येथील १३९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याचा फायदा ऊस व द्राक्ष शेतीला होऊन या परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कोट्यवधी रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही योजना सुरू करण्यासाठी स्थापत्य विभागातील पंपग्रह व विहीर बांधणी, उध्र्वगामी नलिका, वितरण हौद व वितरण प्रणाली, यांत्रिक काम, विद्युत काम, बेडग कालवा येथे पंपग्रह उभा करून १८०० मीटर लांबीची नलिका व वितरण हौद इत्यादी कामे होण्याची गरज आहे. यासाठी अंदाजे १७ कोटी २७ लाख इतका खर्च येण्याची शक्यता आहे.

मिरज पूर्व भागातील भागातील ११०० हेक्टर क्षेत्राला पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याविना नुकसान होत आहे. सदरच्या प्रश्नां बाबत वरीष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून लवकर ही योजना म्हैसाळ प्रकल्पात समाविष्ट करण्याची विनंती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे करणार आहे. - मनोज शिंदे-म्हैसाळकर, सदस्य -कृष्णा कोयना योजना जलसिंचन समिती 

या कामाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी दीड वर्षा पूर्वी पाठवला आहे. पहिला हे काम म्हैसाळ योजनेच्या प्रकल्पात सामाविष्ट होणे गरजेचे आहे. त्यानंतर कामास सुरुवात होईल. काम होण्यास वेळ लागत नाही. - सुर्यकांत नलवडे, म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता -सांगली

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणी