शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली, कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:00 IST

प्रवाशांची सोय

सांगली : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने बुधवारी प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सांगली व किर्लोस्करवाडीमार्गे विशेष एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखविला आहे.या विशेष गाड्या सांगली जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार असून मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’ या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले आहे. या विशेष गाड्यांचा लाभ घेणाऱ्या सांगलीकरांनी जाताना व येताना तिकिटावर सांगली स्थानकाचा उल्लेख करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अशा धावणार विशेष गाड्यामुंबई सीएसएमटी ते कोल्हापूर (गाडी क्र. ०१४१७) ही विशेष गाडी दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता मुंबई सीएसएमटीहून निघेल. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता सांगली स्थानकावर येईल. ८:१० वाजता कोल्हापूरसाठी रवाना होऊन कोल्हापूरला १०:१५ वाजता पोहोचेल.कोल्हापूर ते मुंबई सीएसएमटी (गाडी क्र. ०१४१८) ही विशेष गाडी दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी ४:४० वाजता कोल्हापूर येथून निघेल. ५:४७ वाजता सांगली स्थानकावर पोहोचेल व ५:५० वाजता मुंबईकडे प्रयाण करेल. ही गाडी ११ ऑगस्ट रोजी पहाटे ४:४५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

याठिकाणी थांबे मंजूरदादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज अशी मधील स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.

अशी आहे गाडीची रचना

  • एसी-३ टियर डबे : २
  • स्लीपर डबे : १२
  • जनरल सेकंड क्लास : ६
  • सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन २