शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्षता बाजूला करून नास्तिकताच स्वीकारायला हवी, तुषार गांधी यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 12:26 IST

सांगलीत दहाव्या नास्तिक परिषदेत धर्मांधतेवर टीकास्र

सांगली : देशात धर्मांधतेलाच धर्म मानून प्रतिगामी शक्ती गांधी, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव करण्यास सरसावली आहे. देशाच्या घटनेत धर्मनिरपेक्षता मांडली असली, तरी आताच्या स्थितीत धर्मनिरपेक्षताही बाजूला करून केवळ नास्तिकताच स्वीकारायला हवी, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.ब्राइट सोसायटीच्या वतीने सांगलीत दहावी नास्तिक परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व लेखक जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तुषार गांधी म्हणाले, अहिंसा तर जपलीच पाहिजे; पण त्यापुढे जाऊन धर्मविरहित एक नवी प्रणाली अस्तित्वात आणली पाहिजे.

धर्ममार्तंडांना नाकाम करण्यासाठी ती प्रभावी ठरेल. देशातील प्रतिगामी शक्तींना समाजातून मोठे बळ मिळत आहे. नास्तिकतेचा प्रचार व प्रसार न केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजाला नास्तिकतेच्या दिशेने आपण घेऊन गेले पाहिजे.सध्या भारतात धर्माचा वापर करून ज्या काही घटना घडत आहेत, ते पाहिले की आपला राष्ट्र आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, हे स्पष्ट होते. राजस्थानमध्ये ९ वर्षांच्या दलित मुलाने मटक्यातून पाणी घेतल्याच्या रागातून त्याची अमानुष हत्या केली जाते. मणिपूरमध्ये महिलांवर अमानुष अत्याचार झाल्यानंतरही आपल्याला त्याबाबत काहीही कळत नाही. मध्य प्रदेशमध्ये एकाने आदिवासी दलित मुलाच्या डोक्यावर लघुशंका केली. या घटना पाहून भारतीयांचे रक्त कसे उसळत नाही, असा सवालही गांधी यांनी उपस्थित केला.जावेद अख्तर म्हणाले की, श्रद्धाळू लोकांना मूर्ख बनवून स्वत:चा फायदा करून घेतला जातो. धर्मातील अतार्किक गोष्टी स्वीकारल्यामुळे लोक विचार करू शकत नाहीत. धर्मात स्वर्ग-नरकाच्या कल्पना, मेल्यानंतर सर्व काही मिळेल, अशा अतार्किक गोष्टींचा वापर अत्यंत हुशारीने राजकीय लोक करतात. परमेश्वराशिवाय जगात पत्ताही हालत नाही, असे धर्मात म्हटले आहे; पण लोकांवर अन्याय, अत्याचार, खून, बलात्कार या गोष्टी परमेश्वर का थांबवू शकत नाही, असा साधा विचारही माणूस करीत नाही. हे सर्व घडताना परमेश्वराला लाज कशी वाटत नाही, असा प्रश्नही पडत नाही.ब्राइट सोसायटीचे सचिव कुमार नागे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ब्राइट सोसायटीची उद्दिष्टे मांडली. चंद्रकांत शिंदे यांनी आभार मानले. डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात सलीम मोमीन यांचे सहकारी समुवेल घाटगे, महेश नवाळे, गणेश बिरनाळे यांनी क्रांती गीतांनी केली.

धर्मातूनच हुकूमशाहीचा जन्म : जावेद अख्तरआस्तिकता व नास्तिकता या दोन्हींमध्ये कट्टरता निर्माण होऊ शकते. मात्र, श्रेष्ठत्वाच्या लढाईमुळे धर्म माणसाला विवेकवादाकडे, मूल्यवादी रचनेकडे नेऊ शकत नाही. धर्मातून धर्मांधता व त्यानंतर हुकूमशाहीचा जन्म होतो. नास्तिकताच मूल्यवादी रचना निर्माण करू शकते. त्यामुळे नास्तिकतेकडे समाजाने नकारात्मक दृष्टीने पाहू नये.

नास्तिकता आमच्या घरातच!माझा नास्तिकतेचा प्रवास याविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, माझा जन्म झाल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या कानात ‘कम्युनिस्ट मॅनिफिस्टो’ म्हटले होते. माझे नावही ‘जादू’ असे ठेवले होते. त्यामुळे नास्तिकता ही आमच्या घरामध्येच होती.

हे राम ते नो राम : तुषार गांधींचा प्रवासतुषार गांधी म्हणाले, मला महात्मा गांधी यांचा पणतू म्हणून ओळखतात. गांधीजी धार्मिक होते; परंतु मी तर स्वत: गांधीजींची बिघडी हुई औलाद समजतो. गांधीजींबद्दल वाचत असताना त्यावेळी नास्तिक विचारांचे आंध्र प्रदेशमधील गोरा आणि बापू यांची चर्चा होत असल्याचे दिसले. नास्तिक विचार हा मी लहानपणापासून वाचत आलो आहे. तो आता रुजला आहे.

टॅग्स :Sangliसांगली