शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शिराळ्यात सत्यजित देशमुख यांच्यापुढे आव्हान, कार्यकर्त्यांची मने जुळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:20 IST

शिराळा मतदारसंघातील राजकारण वाळवा-शिराळा तालुक्यातील वेगळ्या वळणावर

अशोक पाटील

इस्लामपूर : शिराळा मतदारसंघातील राजकारण वाळवा-शिराळा तालुक्यातील वेगळ्या वळणावर जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणात पैरा फेडीचा विसर पडतो. देशमुख गटाची अशीच परिस्थिती झाली आहे. कधी बंडखोरी, तर कधी तडजोड, यामुळे आगामी काळात सत्यजित देशमुख यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

विधानसभेच्या १९९५ पासून २०१९च्या निवडणुकीपर्यंत वाळवा तालुक्यातील ४८ गावांत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात प्रबळ गट तयार करून वलय निर्माण केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांच्या बंडखोरीचा फटका त्यांना बसला.त्या विधानसभा निवडणुकीआधी सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊन शिवाजीराव नाईक यांना ताकद दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा शब्द प्रमाण मानला. त्यापूर्वी स्थानिक पातळीवर शिवाजीराव देशमुख आणि शिवाजीराव नाईक एकत्र आले होते. आता देशमुखांना सोडून नाईक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील- आ. मानसिंगराव नाईक यांच्या गटात सामील होणार आहेत. शिराळ्यातील राजकारणात सर्वच नेत्यांना पैऱ्याचा विसर पडत आला आहे.

कार्यकर्त्यांची मने जुळणार का?

शिराळा मतदारसंघात सर्वच निवडणुकांत कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या भूमिकेनुसार वागतात. याचा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणात कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. आता नेते एक झाले, तरीही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मने जुळण्याची सुतराम शक्यता नाही.

आम्हाला काँग्रेसने भरपूर दिले, परंतु जिल्हा पातळीवरील नेत्यांनी डोंगरी भागाला दुर्लक्षित केले. वाळवा-शिराळ्यातील काँग्रेसची वाताहत होत गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. वरिष्ठांनी शिराळ्यात भाजपला ताकद दिली, तरच पक्ष सक्षम होईल. - सत्यजित देशमुख, प्रदेश सदस्य, भाजप.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस