शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शिराळ्यात सत्यजित देशमुख यांच्यापुढे आव्हान, कार्यकर्त्यांची मने जुळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:20 IST

शिराळा मतदारसंघातील राजकारण वाळवा-शिराळा तालुक्यातील वेगळ्या वळणावर

अशोक पाटील

इस्लामपूर : शिराळा मतदारसंघातील राजकारण वाळवा-शिराळा तालुक्यातील वेगळ्या वळणावर जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणात पैरा फेडीचा विसर पडतो. देशमुख गटाची अशीच परिस्थिती झाली आहे. कधी बंडखोरी, तर कधी तडजोड, यामुळे आगामी काळात सत्यजित देशमुख यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

विधानसभेच्या १९९५ पासून २०१९च्या निवडणुकीपर्यंत वाळवा तालुक्यातील ४८ गावांत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात प्रबळ गट तयार करून वलय निर्माण केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांच्या बंडखोरीचा फटका त्यांना बसला.त्या विधानसभा निवडणुकीआधी सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊन शिवाजीराव नाईक यांना ताकद दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा शब्द प्रमाण मानला. त्यापूर्वी स्थानिक पातळीवर शिवाजीराव देशमुख आणि शिवाजीराव नाईक एकत्र आले होते. आता देशमुखांना सोडून नाईक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील- आ. मानसिंगराव नाईक यांच्या गटात सामील होणार आहेत. शिराळ्यातील राजकारणात सर्वच नेत्यांना पैऱ्याचा विसर पडत आला आहे.

कार्यकर्त्यांची मने जुळणार का?

शिराळा मतदारसंघात सर्वच निवडणुकांत कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या भूमिकेनुसार वागतात. याचा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणात कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. आता नेते एक झाले, तरीही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मने जुळण्याची सुतराम शक्यता नाही.

आम्हाला काँग्रेसने भरपूर दिले, परंतु जिल्हा पातळीवरील नेत्यांनी डोंगरी भागाला दुर्लक्षित केले. वाळवा-शिराळ्यातील काँग्रेसची वाताहत होत गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. वरिष्ठांनी शिराळ्यात भाजपला ताकद दिली, तरच पक्ष सक्षम होईल. - सत्यजित देशमुख, प्रदेश सदस्य, भाजप.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस