शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिराळ्यात सत्यजित देशमुख यांच्यापुढे आव्हान, कार्यकर्त्यांची मने जुळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:20 IST

शिराळा मतदारसंघातील राजकारण वाळवा-शिराळा तालुक्यातील वेगळ्या वळणावर

अशोक पाटील

इस्लामपूर : शिराळा मतदारसंघातील राजकारण वाळवा-शिराळा तालुक्यातील वेगळ्या वळणावर जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणात पैरा फेडीचा विसर पडतो. देशमुख गटाची अशीच परिस्थिती झाली आहे. कधी बंडखोरी, तर कधी तडजोड, यामुळे आगामी काळात सत्यजित देशमुख यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

विधानसभेच्या १९९५ पासून २०१९च्या निवडणुकीपर्यंत वाळवा तालुक्यातील ४८ गावांत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात प्रबळ गट तयार करून वलय निर्माण केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांच्या बंडखोरीचा फटका त्यांना बसला.त्या विधानसभा निवडणुकीआधी सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊन शिवाजीराव नाईक यांना ताकद दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा शब्द प्रमाण मानला. त्यापूर्वी स्थानिक पातळीवर शिवाजीराव देशमुख आणि शिवाजीराव नाईक एकत्र आले होते. आता देशमुखांना सोडून नाईक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील- आ. मानसिंगराव नाईक यांच्या गटात सामील होणार आहेत. शिराळ्यातील राजकारणात सर्वच नेत्यांना पैऱ्याचा विसर पडत आला आहे.

कार्यकर्त्यांची मने जुळणार का?

शिराळा मतदारसंघात सर्वच निवडणुकांत कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या भूमिकेनुसार वागतात. याचा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणात कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. आता नेते एक झाले, तरीही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मने जुळण्याची सुतराम शक्यता नाही.

आम्हाला काँग्रेसने भरपूर दिले, परंतु जिल्हा पातळीवरील नेत्यांनी डोंगरी भागाला दुर्लक्षित केले. वाळवा-शिराळ्यातील काँग्रेसची वाताहत होत गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. वरिष्ठांनी शिराळ्यात भाजपला ताकद दिली, तरच पक्ष सक्षम होईल. - सत्यजित देशमुख, प्रदेश सदस्य, भाजप.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस