शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

गार्डी गावचे सरपंच ते आमदार; अनिल बाबरांचा थक्क करणारा राजकीय प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:41 IST

निवडणुकीत जनतेने त्यांना ‘एक नोट, एक व्होट’ देऊन विजयी केले

दिलीप मोहितेसांगली जिल्ह्यातील अतिदुष्काळी खानापूर तालुक्याच्या गार्डी या त्यांच्या छोट्याशा खेडेगावातून आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या संघर्षमय राजकीय प्रवासास सुरुवात झाली. रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे दि. ७ जानेवारी १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाबर यांचा गार्डी गावचे सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना ग्रामस्थांनी गार्डी गावचे सरपंचपद बिनविरोध बहाल केले. तेथून त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. १९७८ ला ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर १९८१ पर्यंत त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापतिपद भूषविले. १९८२ ते १९९० या कालावधीत त्यांनी खानापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीत काम करीत असताना त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते, शाळाखोल्यांचे बांधकाम, दुरुस्ती, पाझर तलाव, नालाबंडिंग यासह जलसंधारणाची कामे, तसेच शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या.१९६७ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघात अनिल बाबर यांनी १९९० ला पहिल्यांदा कॉँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढविली. अपक्ष उमेदवार हणमंतराव पाटील यांचा २५ हजार २६७ मतांनी पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतरच्या १९९५ च्या निवडणुकीत राज्यात आलेल्या अपक्षांच्या लाटेत बाबर यांना आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याकडून सुमारे २० हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.

त्यानंतर १९९९ ला कॉँग्रेसचे राष्ट्रवादीत विभाजन झाल्यानंतर ते शरद पवार यांच्या गोटात सहभागी झाले. त्यावेळी आटपाडीच्या देशमुख गटाच्या पाठिंब्यावर बाबर यांनी कॉँग्रेसचे रामराव पाटील यांचा पराभव केला. २१ हजार ९१६ मतांची आघाडी घेत बाबर दुसऱ्यांदा आमदार झाले.त्यानंतर सन २००४ व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बाबर यांना सदाशिवराव पाटील यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले; परंतु पदावर नसतानाही सलग दहा वर्षे त्यांचा जनसंपर्क कायम हाेता. हाच जनसंपर्क २०१४ च्या निवडणुकीत त्यांना यशापर्यंत घेऊन गेला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाबर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविली. ते धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले. त्यानंतर २०१९ ची निवडणूकही शिवसेनेतून लढवत ते चौथ्यांदा विधानसभेत गेले.राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांना आघाडीतील मित्रपक्षांकडून स्थानिक पातळीवर त्रास हाेऊ लागला. त्याबद्दल त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीच्या काळात मतदारसंघात काम करताना मित्रपक्षातील नेत्यांकडून दुजाभाव होत असल्याचीही त्यांची तक्रार होती. त्यामुळेच बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडात सहभाग घेतला.

बाबर यांचा गार्डीचे सरपंच ते आमदार असा संघर्षमय राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सहकार्यातून मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे मंजूर होऊन ती पूर्णत्वासही गेली. ते मतदारसंघात टेंभू योजनेचे जनक, पाणीदार आमदार म्हणून ओळखले जात होते.टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान जनता कधीही विसरणार नाही. त्यांनी १९९९ ते २००८ या कालावधीत बाबर यांनी नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. गेल्या २० वर्षांपासून ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक आहेत. शेतकरी कुटुंबातील व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांचा सरपंच ते आमदारकीपर्यंतचा संघर्षमय राजकीय प्रवास संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात कायम राहील.

‘एक नोट, एक व्होट’चे पहिले आमदार..प्रचंड जनसंपर्क आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे १९९० मध्ये खानापूर-आटपाडी मतदारसंघातून कॉँग्रेसतर्फे अनिल बाबर निवडून आले. या निवडणुकीत जनतेने त्यांना ‘एक नोट, एक व्होट’ देऊन विजयी केले. बहुधा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा. त्यामुळे जनतेच्या मतांवर आणि निधीवर निवडून आलेले आमदार अशी त्यांची ख्याती त्या काळात सर्वत्र होती.

टॅग्स :SangliसांगलीsarpanchसरपंचMLAआमदार