शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

सांगली आमदारांचे ११ महिन्यांत २० कोटी खर्ची, महिन्यात पाच कोटींचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:33 IST

सांगली : जिल्ह्यात विधानसभा आठ आणि तीन विधानपरिषदेचे आमदार असून, यांच्यासाठी २०१७-१८ वर्षामध्ये विकास निधी म्हणून २५ कोटी १९ लाख ६७ हजारांचा निधी मंजूर होता.

ठळक मुद्देनिधीतील अखर्चित रक्कम एप्रिलमध्ये जाणार शासनाकडे परत

अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्ह्यात विधानसभा आठ आणि तीन विधानपरिषदेचे आमदार असून, यांच्यासाठी २०१७-१८ वर्षामध्ये विकास निधी म्हणून २५ कोटी १९ लाख ६७ हजारांचा निधी मंजूर होता. यापैकी ११ महिन्यांमध्ये २० कोटी ४२ लाखांच्या निधीतून ४०३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. उर्वरित पाच कोटींची कामेच आमदारांनी सुचविली नसल्यामुळे तो निधी एका महिन्यात खर्च करण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. शिल्लक निधी वेळेत खर्च केला नाही तर, तो दि. १ एप्रिलला परत राज्य शासनाकडे जाणार आहे.

राज्य शासनाकडून प्रत्येक विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना वर्षाला दोन कोटींचा विकास निधी दिला जातो. मतदारसंघातील गावांमध्ये त्यांच्या गरजेनुसार रस्ते, गटारी, सांस्कृतिक भवन, पूर संरक्षित भिंत, स्मशानभूमी आदी कामांवर निधी खर्च करता येतो. या निधीच्या दीडपटीमध्ये विकास कामे करण्याचा अधिकारही आमदारांना शासनाने दिले आहेत. काही आमदार दोन कोटींहून अधिक निधी खर्च करतात. पण, काही आमदारांना वर्षभरात शासनाकडून मिळणारा दोन कोटींचा निधीही खर्च होत नसल्यामुळे जादाचा निधी खर्चाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत.

शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी २०१७-१८ या वर्षात दोन कोटी दोन कोटी २४ लाख ६३ हजाराच्या २९ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. निधी खर्च करण्याचे प्रमाण ९९.५० टक्के असून, जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या खर्चाच्या आकडेवारीत सर्वाधिक आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा त्या खालोखाल क्रमांक लागत असून, त्यांनी ९८.३८ निधी खर्च केला आहे. विधानपरिषदेचे आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या फंडातील ९८.१ टक्के निधी खर्च आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांनीही ९७.७४ टक्के निधी खर्च झाला आहे.

खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचा ६४.५० टक्के, तर इस्लामपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा ७७.९४ टक्के निधीतून विकास कामे केली आहेत. सर्वात कमी निधी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा ४०.६२ टक्के झाला आहे. जतचे आमदार विलासराव जगताप यांचा ८४.१३ टक्के, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचा ९२.३८ टक्के निधी खर्च झाला आहे.

विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम यांचा ६७.७५ टक्के, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा आमदार फंडही ८०.८६ टक्केच खर्च झाला आहे. हा निधी त्वरित खर्च करण्याची मागणी होत आहे.गावांना नाही निधी : प्रशासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी मिळत नाही. अनेक गावांना रस्ते, गटारी, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी निधी नसल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होते. असे असतानाही आमदारांच्या विकास निधीतील लाखो रुपयांचा फंड शिल्लक राहतोच कसा, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य आणि काही गावाच्या सरपंचांनी उपस्थित केला आहे.आमदारांच्या निधी खर्चाचा लेखाजोखा(जानेवारीअखेर)आमदार मंजूर निधी खर्च टक्केवारीतशिवाजीराव नाईक २२५.७६ लाख ९९.५०अनिल बाबर २२६.६५ लाख ६४.५०जयंत पाटील २७४.८३ लाख ७७.९४सुरेश खाडे १७६.४७ लाख ९२.३८सुधीर गाडगीळ २३७.१० लाख ९८.३८पतंगराव कदम २२८.६० लाख ४०.६२विलासराव जगताप २१८.२३ लाख ८४.१३सुमनताई पाटील २३६.४१ लाख ९७.७४सदाभाऊ खोत २२८.३५ लाख ८०.८६शिवाजीराव देशमुख १७४.६६ लाख ९८.१मोहनराव कदम २९३.६१ लाख ६७.७५एक महिन्यात जवळपास पाच कोटींचा निधी खर्च करण्याचे आमदार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दि. ३१ मार्चअखेर निधी खर्च झाला नाही, तर तो शासनाकडे परत जाणार आहे.