शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सांगली : मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू : अजित नवले, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दुधाचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:22 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. सध्या १६ ते १७ रुपये लिटरने दूधाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लिटरमागे दहा रुपयांचा तोटा शेतकरी सहन करू शकत नाही.

ठळक मुद्देसांगली : मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू : अजित नवलेभाजपच्या पदाधिकाऱ्यांना दुधाचे मोफत वाटप

सांगली : राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. सध्या १६ ते १७ रुपये लिटरने दूधाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लिटरमागे दहा रुपयांचा तोटा शेतकरी सहन करू शकत नाही.

येत्या ३ ते ९ मे दरम्यान दूध वाटप सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची दखल न घेतल्यास मुंबई, पुण्यासह मोठ्या शहराचा दूधपुरवठा रोखला जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसचिव अ‍ॅड. अजित नवले यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.नवले म्हणाले की, येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. या संपावेळी व लाँगमार्चवेळी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत आश्वासन दिले होते. पण त्याची पुर्तता केलेली नाही.

कर्जमाफीसह काही मागण्यांच्या अंमलबजावणीत सरकारने एक पाऊल पुढे टाकले असले तरी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यवाहीवर शेतकरी समाधानी नाही. या आंदोलनादरम्यानच सरकारने दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. पण गेली वर्षभर दूधाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या दुधाचा दर लिटरला १६ ते १७ रुपये इतका आहे. हा शेतकऱ्यांना परवडणारा नाही.दुसरीकडे सरकार मात्र दुधाचा महापूर आल्याचे सांगत आहे. ते पूर्णत: चुकीचे आहे. शेतकऱ्यांकडून गायी व म्हैशीचे ३.५, ८.५ फॅटचे दूध संकलन करून त्याचे तिप्पट उत्पादन दूध संघातून सुरू आहे.

शहरी लोकांना केवळ १.५ फॅटच्या दूधाचे वितरण केले जाते. दूधाची अतिरिक्त निर्मिती ही दूध संघातून होत आहे. त्याला सरकारचे पाठबळही आहे. दूधाचे उत्पादन, वितरण व इतर उत्पादने याची कसलीही आकडेवारी सरकारकडे नाही. आवक कमी व पुरवठा जादा अशी विसंगत परिस्थिती आहे.

त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर कोसळल्याने दूध संघाकडून पावडरची निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात दूधाचा अतिरिक्त पुरवठा दिसून येतो. पण हे सत्य सांगण्याचे धाडस भाजप सरकारकडे नाही. त्यासाठी समविचारी संघटनांना सोबत घेऊन दूध उत्पादक संघर्ष समिती स्थापन केली आहे.या समितीच्यावतीने येत्या ३ ते ९ मे दरम्यान मोफत दूध वाटप करून सत्याग्रह आंदोलन केले जाईल. शरम नसेल तर मोफत दूध न्या, लुटता कशाला मोफत न्या, असे ठरावही ग्रामसभेतून केले जाणार आहेत. या आंदोलनाची दखल भाजप सरकारने घेतली नाही तर मोठ्या शहराचा दूध पुरवठा रोखला जाईल. अगदी परराज्यातून होणारा दूध पुरवठाही बंद करू, असा इशारा नवले यांनी दिला.

दहा कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे संकलनशेतीमालाला हमी भाव व स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी देशस्तरावरील शेतकऱ्यांच्या संघटनांना एकत्र करून देशव्यापी लढ्याची तयारी सुरू आहे. त्यातून दहा कोटी शेतकऱ्यांच्या सह्या संकलन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रातून २० लाख शेतकऱ्यांच्या सह्या घेतला जातील. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येईल. त्यानंतरही त्याची दखल न घेतल्यास देशव्यापी आंदोलन हाती घ्यावे लागले, असेही नवले म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाmilkदूधFarmerशेतकरी