शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
3
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
4
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
5
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
6
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
7
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
8
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
9
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
10
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
11
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
12
जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !
13
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
14
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
15
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
16
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
17
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
18
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
19
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
20
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:40 IST

जिल्हा बँकेकडून उद्दिष्टाच्या ७० टक्के वितरण

सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बळीराजाची पेरणीची घाई आहे. या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जूनअखेर तब्बल ८०१ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यात कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ७० टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८८ हजार १५४ शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.मानसिंगराव नाईक व शिवाजीराव वाघ म्हणाले, यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतात पेरणीची घाई सुरू आहे. त्यासाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना जून महिन्यापूर्वीच पीककर्ज मिळणे आवश्यक असते. मात्र, मे आणि जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीला विलंब झाला आहे. तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाला शून्य टक्के व्याज आकारले जाते. जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले जात आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामातील पिकांसाठी १ हजार १४८ कोटी चार लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी सध्या ८८ हजार १५४ शेतकऱ्यांना ८०१ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उर्वरित कर्ज वाटपाचे उद्दिष्ट येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.

असे आहे पीक कर्ज वाटपपीक - शेतकरी संख्या / पीक कर्ज वाटप

  • ऊस - ५०३८४ / ४४५.९ कोटी
  • सोयाबीन - ६०२० / २.१६ कोटी
  • डाळिंब - ६०८२ / ६.१८ कोटी
  • द्राक्ष - १००३० / २१७.९७ कोटी
  • कापूस - ११६४७ / ३.९६ कोटी
  • इतर पिकांसाठी - १०१६ / ६.८२ कोटी