शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सांगली : डेंग्यू, हिवतापासाठी ३६ गावे संवेदनशील : अभिजित राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:42 IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची पैदास वाढणार आहे. मागील पाच वर्षात ३६ गावात डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुन्याचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने ती गावे संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देडेंग्यू, हिवतापासाठी ३६ गावे संवेदनशील : अभिजित राऊत हिवतापाविरोधात जागृती; लोकसहभाग महत्त्वाचा

सांगली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची पैदास वाढणार आहे. मागील पाच वर्षात ३६ गावात डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुन्याचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने ती गावे संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले.

डासांची घनता जास्त असलेल्या सात गावांत औषध फवारणीसह अन्य उपाय करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच हिवतापविरोधी मोहिमेत लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले, जून महिन्यात हिवताप जनजागरण मोहीम साजरी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हिवताप नियंत्रणात आहे. जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुन्या या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

शहरी आणि ग्रामीणमध्ये हिवताप रोगाचे रुग्ण अधिक आढळत आहेत. मागील पाच वर्षात डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुन्याचे ३६ गावांत सर्वाधिक रुग्ण आढळले होते, या गावांना संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे.

यात मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, समडोळी, सांगली सिव्हिल, मिरज महापालिका, ईदगाहनगर (ता. मिरज), जत व आवंढी (ता. जत), गौरगाव, मांजर्डे, मणेराजुरी, तासगाव, येळावी (ता. तासगाव), आष्टा, वाळवा, इस्लामपूर, बोरगाव आणि तुजारपूर (ता. वाळवा), शिराळा व मणदूर (ता. शिराळा), कवठेमहांकाळ, तिसंगी आणि ढालगाव (ता. कवठेमहांकाळ), विटा आणि खानापूर (ता. खानापूर), कडेगाव व नेवरी (ता. कडेगाव), आंधळी व पलूस (ता. पलूस) व खरसुंडी आणि विभुतवाडी (ता. आटपाडी) यांचा समावेश आहे.तेरा गावे कायमस्वरुपी संवेदनशील आहेत. मिरज तालुक्यातील म्हैसाळ, आसंगी तुर्क, देवनूर (ता. जत), बागणी (ता. वाळवा), शिरसी, आंबेवाडी (ता. शिराळा), जांभुळवाडी (ता. कवठेमहांकाळ), साळशिंगे (ता. खानापूर), येवलेवाडी, अमरापूर, शिरसगाव (ता. कडेगाव) आणि शेटफळे (ता. आटपाडी) या गावांचा समावेश आहे.

डेंग्यूचे २०१७ मध्ये ३३३ रुग्ण संशयित होते, त्यांची तपासणी केली असता, ५८ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. मे २०१८ मध्ये १२७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील २६ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. २०१७ मध्ये डेंग्यूसदृश २१४ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, त्यातील ६२ रुग्णांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले.

मे २०१८ मध्ये १०८ रुग्णांची तपासणी केली असता, ३७ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. जनजागरण माहिमेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील म्हणाले, हिवताप रोखण्यासाठी काही ग्रामपंचायतींकडे यंत्रे आहेत. गप्पी माशांचा वापर श्रेयस्कर ठरतो. जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, अंग उघडे टाकून झोपू नये, सायंकाळी ६ ते ८ वेळेत दारे-खिडक्या बंद कराव्यात, जाळ्याही बसवाव्यात.

डास न होण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. गटारी वाहत्या ठेवाव्यात, पाणी साठवायचे असेल तर बंद करून ठेवावे. टाक्या वेळोवेळी स्वच्छ कराव्यात, डास मारणे धोक्याचे आहे. आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळावा, असे आवाहन केले.सात गावांत डासांचा उच्छादजिल्ह्यातील सात गावांत डासांची घनता सर्वाधिक आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी १९.३६, अंकलखोप १९.२९, अमरापूर (ता. कडेगाव) ११.७६, नांद्रे (ता. मिरज) १६.१२, कसबेडिग्रज (ता. मिरज) १८.१८, मणेराजुरी (ता. तासगाव) १४.५१ आणि येळावी (ता. तासगाव) ११.१९ टक्के अशी डासांची घनता आहे.

शिराळा तालुक्यातील माळेवाडी येथे १३.२९ टक्के डासांची घनता होती, परंतु सध्या घनता कमी झाली असल्याचे प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीdengueडेंग्यू