शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागनाथअण्णांच्या आवाजानेच शेतकऱ्यांचा उद्धार

By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST

राज बब्बर : वाळव्यात क्रांतिवीरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; मान्यवरांकडून आदरांजली

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांचा आवाज जिवंत ठेवायचा असेल, तर त्यांच्या विचार व तत्त्वाने त्यांचे कार्य पुढे अखंड सुरू ठेवले पाहिजे. अण्णांचा आवाज सदैव जिवंत ठेवल्यास हुतात्मा संकुलाच्या माध्यमातून सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचा उध्दार होईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, ज्येष्ठ सिनेअभिनेते व माजी खासदार राज बब्बर यांनी आज (मंगळवारी) येथे केले.क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज बब्बर बोलत होते. राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी समारंभाचे निमंत्रक वैभव नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, कुसूमताई नायकवडी, सौ. सरोजमाई पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, अ‍ॅड. सुभाष पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, सरपंच गौरव नायकवडी, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.राज बब्बर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अण्णांनी उपेक्षित, पीडित, वंचित, दीनदलित, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. परिवर्तनवादी विचारधारेमुळे ते सत्तेमध्ये आले नाहीत. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, सहकार चळवळ शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आहे. ती जिवंत ठेवण्याचे काम यापुढे करायला हवे. जाती-धर्माच्या, विविध पंथांच्या व अंधश्रध्देच्या नावाखाली चालू असलेले राजकारण थांबवून समाजाच्या हिताचे, प्रगतीचे राजकारण करणे हीच अण्णांना आदरांजली ठरेल.प्रा. डॉ. बाबूराव गुरव, कुसूमताई नायकवडी, प्रा. बाळासाहेब नायकवडी, सौ. सरोजमाई पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. वैभव नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, टेंभू योजनेतून दुष्काळग्रस्तांना पाणी मिळण्यासाठी अण्णांनी सतत २० वर्षे संघर्ष केला. यावेळी किरण नायकवडी, सरपंच गौरव नायकवडी, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, गंगाराम सूर्यवंशी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, महादेव कांबळे, भगवान अडिसरे, नामदेव गावडे, अरुण यादव, शंकर खोत, बी. आर. थोरात, आनंदा पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, दूध संघाचे कार्यकारी संचालक एन. एम. मंडलिक व नागरिक उपस्थित होते. प्रा. राजा माळगी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)