शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

नागनाथअण्णांच्या आवाजानेच शेतकऱ्यांचा उद्धार

By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST

राज बब्बर : वाळव्यात क्रांतिवीरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम; मान्यवरांकडून आदरांजली

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांचा आवाज जिवंत ठेवायचा असेल, तर त्यांच्या विचार व तत्त्वाने त्यांचे कार्य पुढे अखंड सुरू ठेवले पाहिजे. अण्णांचा आवाज सदैव जिवंत ठेवल्यास हुतात्मा संकुलाच्या माध्यमातून सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचा उध्दार होईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, ज्येष्ठ सिनेअभिनेते व माजी खासदार राज बब्बर यांनी आज (मंगळवारी) येथे केले.क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज बब्बर बोलत होते. राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी समारंभाचे निमंत्रक वैभव नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, कुसूमताई नायकवडी, सौ. सरोजमाई पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, अ‍ॅड. सुभाष पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, सरपंच गौरव नायकवडी, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.राज बब्बर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अण्णांनी उपेक्षित, पीडित, वंचित, दीनदलित, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. परिवर्तनवादी विचारधारेमुळे ते सत्तेमध्ये आले नाहीत. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, सहकार चळवळ शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आहे. ती जिवंत ठेवण्याचे काम यापुढे करायला हवे. जाती-धर्माच्या, विविध पंथांच्या व अंधश्रध्देच्या नावाखाली चालू असलेले राजकारण थांबवून समाजाच्या हिताचे, प्रगतीचे राजकारण करणे हीच अण्णांना आदरांजली ठरेल.प्रा. डॉ. बाबूराव गुरव, कुसूमताई नायकवडी, प्रा. बाळासाहेब नायकवडी, सौ. सरोजमाई पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. वैभव नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, टेंभू योजनेतून दुष्काळग्रस्तांना पाणी मिळण्यासाठी अण्णांनी सतत २० वर्षे संघर्ष केला. यावेळी किरण नायकवडी, सरपंच गौरव नायकवडी, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, गंगाराम सूर्यवंशी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, महादेव कांबळे, भगवान अडिसरे, नामदेव गावडे, अरुण यादव, शंकर खोत, बी. आर. थोरात, आनंदा पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, दूध संघाचे कार्यकारी संचालक एन. एम. मंडलिक व नागरिक उपस्थित होते. प्रा. राजा माळगी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)