शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महामार्गबाधित मोठ्या झाडांचे पुनर्राेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:16 AM

मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक पाऊल : शिल्पकार विजय गुजर यांचा उपक्रम

मिरज : मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित केलेल्या कळंबीजवळ शेतजमिनीत असलेली सुमारे ७० आंबा व नारळाची झाडे क्रेनच्या साहाय्याने उचलून त्यांचे पुनर्रोपण केले आहे. महामार्गासाठी हजारो झाडे तोडण्यात येत असताना, पदरमोड करीत मोठा खर्च करून शेतातील झाडे वाचविण्याची विजय गुजर यांची ही धडपड पर्यावरणासाठी आदर्शवत ठरली आहे.

मिरज तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर या महामार्गासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. या संपादित जमिनीत असलेल्या झाडांची शेतकऱ्यांना भरपाई देऊन अनेक गावांतील शेतांमध्ये व रस्त्याकडेला असणारी झाडे तोडण्यात येणार आहेत. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे.

मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी कळंबी गावच्या हद्दीत असलेल्या शेतात १५ वर्षांपूर्वी मोठे शिल्पसंग्रहालय व विविध प्रकारची फळझाडे लावली होती. गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत. शेतात अनेक लहान-मोठ्या शिल्पकृतीही ठेवल्या आहेत. शेतात ३० फूट उंचीचे मारुतीचे भव्य शिल्प मिरज-पंढरपूर मार्गावर नजरेस पडते. मात्र महामार्गासाठी संपादित होणाºया दीड एकर शेतजमिनीत पंधरा वर्षे जोपासलेली ४० आंब्याची, ३० नारळाची झाडे व अन्य फळझाडेही नष्ट होणार असल्याने, विजय गुजर यांनी या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निश्चय केला.

गेला महिनाभर या झाडांच्या पुनर्राेपणाचे काम सुरू असून यासाठी जेसीबी, पोकलॅन व क्रेनचा वापर करण्यात येत आहे. जेसीबीने झाडांभोवती खड्डा काढून मुळांसह झाडे क्रेनच्या साहाय्याने उचलून तेथून काही अंतरावर असलेल्या शेतजमिनीत मोठा खड्डा काढून तेथे या झाडांचे रोपण करण्यात येत आहे.

पर्यावरणप्रेमींना दिलासापुनर्राेपण केलेली झाडे पुन्हा पूर्वीप्रमाणे जगतील, बहरतील व पर्यावरणाची हानी टाळता येईल, असा विश्वास गुजर यांनी व्यक्त केला. मिरज-पंढरपूर रस्त्यावर महामार्गासाठी हजारो झाडे तोडण्यात येत असताना, झाडांचे पुनर्राेपण करण्याचे विजय गुजर यांचे प्रयत्न पर्यावरणप्रेमींना दिलासा देणारे आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग