शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

प्रभारी पालकत्वापासून सांगली जिल्ह्याची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 1:45 PM

पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे.

सांगली : गेल्या पाच वर्षापासून बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांच्या हाती असणारे जिल्ह्याचे प्रभारी पालकत्व आता संपणार आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारे विकास कामांसाठी पालकमंत्रीपद महत्वाचे आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीची अखेर सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातून जयंत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप बाकी असला तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाटील यांच्याकडेच जबाबदारी येणार, हे निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातीलच नेत्याला हे महत्त्वाचे पद मिळणार आहे.

महायुतीच्या कालावधित गेल्या पाच वर्षापासून सुरुवातीला कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील व त्यानंतर सोलापूरच्या सुभाष देशमुख यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. मात्र, जिल्ह्यातील कामकाजात अपवाद वगळता त्यांचा सहभागच जाणवत नसे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी आल्यानंतर, तातडीने आपापल्या जिल्ह्यात परत जाण्यासाठी त्यांची लगबग असे. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील प्रश्न तडीस नेण्याबाबतही दोघांची धडपड अपवादानेच दिसून आल्याने, जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

नव्या सरकारमध्ये पालकमंत्री पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे येणार हे निश्चित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देताना पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. जिल्हा परिषदेसह अन्य यंत्रणांना द्यावयाचा निधी, त्याचा विनियोग यासह पायाभूत सुविधांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठीही पालकमंत्री महत्वाची भूमिका बजावत असल्याने, जिल्ह्यातील मंत्र्याकडे पालकत्व असणे आवश्यक असते. ती अपेक्षा आता पूर्ण होणार आहे.

पतंगरावांची कामगिरी 'लय भारी'!

आघाडी सरकारच्या कालावधित पतंगराव कदम यांच्याकडे कोणत्याही विभागाचे मंत्रीपद असले तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री पद मात्र कायम होते. यामुळेच त्यांची जिल्ह्यातील ओळख पालकमंत्री अशीच होती. अधिकाऱ्यांना केवळ सूचना न देता, त्याक्षणीच आदेश देत काम मार्गी लावण्यात पतंगरावांचा हातखंडा होता. जिल्हा नियोजनच्या बैठकांतही चर्चेचे गुहाळ ठेवता जागच्या जागी निर्णय घेत समोरच्याला दिलासा मिळत असल्याने, पालकमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच ठरली होती.