शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Kolhapur-Miraj railway: राजर्षी शाहू महाराजांनी ३ वर्षांत केलं, प्रजेला १३४ वर्षे नाही जमलं!

By संतोष भिसे | Updated: April 30, 2025 18:35 IST

संतोष भिसे सांगली : राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर - मिरज लोहमार्गासाठी चांदीचे फावडे मारले आणि अवघ्या तीनच वर्षांत आगगाडी ...

संतोष भिसेसांगली : राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर-मिरज लोहमार्गासाठी चांदीचे फावडे मारले आणि अवघ्या तीनच वर्षांत आगगाडी धावू लागली. सोमवारी (दि. २१) या ऐतिहासिक घटनेला १३४ वर्षे झाली. या प्रदीर्घ कालावधीत या लोहमार्गाचा अपेक्षित विकास झाला नाही. शाहू राजांनी अवघ्या तीन वर्षांत जे केले, त्या तुलनेत थोडेही काम प्रजेला १३४ वर्षांनंतरही जमलेले नाही.

गेल्या १३४ वर्षांत या मीटरगेजचे ब्रॉडगेज आणि विद्युतीकरण झाले, हीच काय ती जमेची बाजू. मिरज ते कोल्हापूर दुहेरीकरणाचा प्रस्तावित खर्च ९८३ कोटी ९५ लाख रुपये आहे. त्यातील ५० टक्के खर्चाची जबाबदारी राज्य शासनावर आहे. हा प्रस्ताव १० ऑक्टोबर २०२२ रोजी रेल्वे मंडळाकडे सादर झाला. पण, आजतागायत त्यावर निर्णायक कार्यवाही झालेली नाही.दुहेरीकरणाअभावी गाड्यांची संख्या, नव्या गाड्यांवर मर्यादा येत आहेत. टर्मिनस असल्याने प्रवास येथेच थांबतो. मोठे औद्योगिक क्षेत्र असूनही रेल्वेचा फायदा मिळत नाही. उद्योजकांना रेल्वेसेवेसाठी मिरजेला यावे लागते. पण याचे कोणतेच सुखदुख कोल्हापूरकरांना नसावे अशी स्थिती आहे.इतकीही धमक नाही? 

मिरज ते कोल्हापूर दुहेरीकरण, कोल्हापुरातून कोकण रेल्वेला जोडण्यासाठी वैभववाडी मार्ग, कोल्हापूर स्थानकाचे विस्तारीकरण, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या, जयसिंगपूर, हातकणंगलेसह सर्व स्थानकांचे आधुनिकीकरण, हातकणंगलेतून इचलकरंजीसाठी लोहमार्ग हे काही आत्यंतिक गरजेचे व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी पाठपुराव्याची धमक सांगली, कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींमध्ये नाही का? असा प्रश्न पुढे येतो.

इचलकरंजीकरांची फरपट थांबेनापश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे औद्योगिक शहर असलेले इचलकरंजी रेल्वेपासून वंचित आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात लोहमार्गासाठी एक-दोन कोटींच्या तरतूदीपलिकडे फारसे काही होत नाही. ८ किलोमीटर लांबीच्या या ब्रॉडगेजचे सर्वेक्षण २०१७-१८ मध्ये सुरु झाले. २ जानेवारी २०२० मध्ये अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपुर्द करण्यात आला. प्रकल्पाचा खर्च सुमारे १८० कोटी ७३ लाख रुपये आहे. पण, हा सारा कारभार फक्त कागदावरच आहे. इचलकरंजीकरांची फरपट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

तरतूद पे तरतूद! कोल्हापूर - वैभववाडी या १०७ किलोमीटर लोहमार्गाचा प्रकल्प अहवाल ७ मे २०१७ रोजी रेल्वे मंडळाकडे सादर झाला. मिरज-कोल्हापूर या ४६ किलोमीटर दुहेरीकरणासाठीही रेल्वेच्या ब्ल्यू बुकमध्ये २०१४-१५ पासून तरतूद केली जात आहे. काम मात्र आजतागायत सुरू झालेले नाही. दरवर्षी फक्त तरतुदीच होत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे