शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Kolhapur-Miraj railway: राजर्षी शाहू महाराजांनी ३ वर्षांत केलं, प्रजेला १३४ वर्षे नाही जमलं!

By संतोष भिसे | Updated: April 30, 2025 18:35 IST

संतोष भिसे सांगली : राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर - मिरज लोहमार्गासाठी चांदीचे फावडे मारले आणि अवघ्या तीनच वर्षांत आगगाडी ...

संतोष भिसेसांगली : राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर-मिरज लोहमार्गासाठी चांदीचे फावडे मारले आणि अवघ्या तीनच वर्षांत आगगाडी धावू लागली. सोमवारी (दि. २१) या ऐतिहासिक घटनेला १३४ वर्षे झाली. या प्रदीर्घ कालावधीत या लोहमार्गाचा अपेक्षित विकास झाला नाही. शाहू राजांनी अवघ्या तीन वर्षांत जे केले, त्या तुलनेत थोडेही काम प्रजेला १३४ वर्षांनंतरही जमलेले नाही.

गेल्या १३४ वर्षांत या मीटरगेजचे ब्रॉडगेज आणि विद्युतीकरण झाले, हीच काय ती जमेची बाजू. मिरज ते कोल्हापूर दुहेरीकरणाचा प्रस्तावित खर्च ९८३ कोटी ९५ लाख रुपये आहे. त्यातील ५० टक्के खर्चाची जबाबदारी राज्य शासनावर आहे. हा प्रस्ताव १० ऑक्टोबर २०२२ रोजी रेल्वे मंडळाकडे सादर झाला. पण, आजतागायत त्यावर निर्णायक कार्यवाही झालेली नाही.दुहेरीकरणाअभावी गाड्यांची संख्या, नव्या गाड्यांवर मर्यादा येत आहेत. टर्मिनस असल्याने प्रवास येथेच थांबतो. मोठे औद्योगिक क्षेत्र असूनही रेल्वेचा फायदा मिळत नाही. उद्योजकांना रेल्वेसेवेसाठी मिरजेला यावे लागते. पण याचे कोणतेच सुखदुख कोल्हापूरकरांना नसावे अशी स्थिती आहे.इतकीही धमक नाही? 

मिरज ते कोल्हापूर दुहेरीकरण, कोल्हापुरातून कोकण रेल्वेला जोडण्यासाठी वैभववाडी मार्ग, कोल्हापूर स्थानकाचे विस्तारीकरण, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या, जयसिंगपूर, हातकणंगलेसह सर्व स्थानकांचे आधुनिकीकरण, हातकणंगलेतून इचलकरंजीसाठी लोहमार्ग हे काही आत्यंतिक गरजेचे व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी पाठपुराव्याची धमक सांगली, कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींमध्ये नाही का? असा प्रश्न पुढे येतो.

इचलकरंजीकरांची फरपट थांबेनापश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे औद्योगिक शहर असलेले इचलकरंजी रेल्वेपासून वंचित आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात लोहमार्गासाठी एक-दोन कोटींच्या तरतूदीपलिकडे फारसे काही होत नाही. ८ किलोमीटर लांबीच्या या ब्रॉडगेजचे सर्वेक्षण २०१७-१८ मध्ये सुरु झाले. २ जानेवारी २०२० मध्ये अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपुर्द करण्यात आला. प्रकल्पाचा खर्च सुमारे १८० कोटी ७३ लाख रुपये आहे. पण, हा सारा कारभार फक्त कागदावरच आहे. इचलकरंजीकरांची फरपट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

तरतूद पे तरतूद! कोल्हापूर - वैभववाडी या १०७ किलोमीटर लोहमार्गाचा प्रकल्प अहवाल ७ मे २०१७ रोजी रेल्वे मंडळाकडे सादर झाला. मिरज-कोल्हापूर या ४६ किलोमीटर दुहेरीकरणासाठीही रेल्वेच्या ब्ल्यू बुकमध्ये २०१४-१५ पासून तरतूद केली जात आहे. काम मात्र आजतागायत सुरू झालेले नाही. दरवर्षी फक्त तरतुदीच होत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे