शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर बंधाऱ्याला संरक्षण मिळणार

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

हल्ल्याची भीती : कर्नाटकात तीव्र पाणीटंचाई; महाराष्ट्रातून पाणी सोडण्याची मागणी

मिरज : कर्नाटकात सीमाभागात तीव्र पाणी टंचाईमुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने वारणा व दूधगंगा धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पाण्यासाठी कर्नाटकातील ग्रामस्थांचा हल्ला होऊ नये, यासाठी राजापूर बंधाऱ्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या हालचाली सुरु आहेत.शिरोळजवळ राजापूर येथील बंधाऱ्यापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा व दूधगंगा धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने केली आहे. मात्र या मागणीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाणी टंचाईमुळे २००३ व २००४ मध्ये अथणी तालुक्यातील ग्रामस्थांनी राजापूर बंधाऱ्यावर हल्ला करुन जेसीबीने बरगे उपसले होते. त्यावेळी स्थानिक व कर्नाटकातील ग्रामस्थांत धुमश्चक्री झाली होती. याप्रकरणी कर्नाटकातील ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करुन राजापूर बंधाऱ्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजापूर बंधाऱ्यात सध्या पाव टीएमसी पाणी असून पाणी सोडण्यासाठी कर्नाटकातील ग्रामस्थांकडून दबाव आहे. कर्नाटकात पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने राजापूर बंधाऱ्यावर हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याबाबत पाटबंधारे विभागाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली. दूधगंगा नदीवर धरण बांधताना झालेल्या कराराप्रमाणे कर्नाटकाला उन्हाळ्यात चार टीएमसी पाणी द्यावयाचे आहे. कर्नाटकाला आतापर्यंत दोन टीएमसी पाणी सोडले असून पाणीटंचाईमुळे आणखी चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी आहे. (वार्ताहर) पाण्याविना सीमाभागातील नळपाणी योजना बंद कर्नाटकात सीमाभागात तीव्र पाणीटंचाई आहे. उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावात नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. या गावांत विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा वापर सुरू आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळीही खालावत असून पाणी टंचाईने त्रस्त सीमाभागातील ग्रामस्थ महाराष्ट्रातून पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत.