शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

राजापूर बंधाऱ्याला संरक्षण मिळणार

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

हल्ल्याची भीती : कर्नाटकात तीव्र पाणीटंचाई; महाराष्ट्रातून पाणी सोडण्याची मागणी

मिरज : कर्नाटकात सीमाभागात तीव्र पाणी टंचाईमुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने वारणा व दूधगंगा धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पाण्यासाठी कर्नाटकातील ग्रामस्थांचा हल्ला होऊ नये, यासाठी राजापूर बंधाऱ्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या हालचाली सुरु आहेत.शिरोळजवळ राजापूर येथील बंधाऱ्यापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा व दूधगंगा धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने केली आहे. मात्र या मागणीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाणी टंचाईमुळे २००३ व २००४ मध्ये अथणी तालुक्यातील ग्रामस्थांनी राजापूर बंधाऱ्यावर हल्ला करुन जेसीबीने बरगे उपसले होते. त्यावेळी स्थानिक व कर्नाटकातील ग्रामस्थांत धुमश्चक्री झाली होती. याप्रकरणी कर्नाटकातील ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करुन राजापूर बंधाऱ्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजापूर बंधाऱ्यात सध्या पाव टीएमसी पाणी असून पाणी सोडण्यासाठी कर्नाटकातील ग्रामस्थांकडून दबाव आहे. कर्नाटकात पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने राजापूर बंधाऱ्यावर हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याबाबत पाटबंधारे विभागाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली. दूधगंगा नदीवर धरण बांधताना झालेल्या कराराप्रमाणे कर्नाटकाला उन्हाळ्यात चार टीएमसी पाणी द्यावयाचे आहे. कर्नाटकाला आतापर्यंत दोन टीएमसी पाणी सोडले असून पाणीटंचाईमुळे आणखी चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी आहे. (वार्ताहर) पाण्याविना सीमाभागातील नळपाणी योजना बंद कर्नाटकात सीमाभागात तीव्र पाणीटंचाई आहे. उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावात नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. या गावांत विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा वापर सुरू आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळीही खालावत असून पाणी टंचाईने त्रस्त सीमाभागातील ग्रामस्थ महाराष्ट्रातून पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत.