शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पुणे-मिरज-कोल्हापूरकरांनो कृपया लक्ष द्या! दोन वर्षे बंद असलेल्या चार पॅसेंजर रेल्वे सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 9:53 PM

पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गावर गेली दोन वर्षे बंद असलेल्या चार पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे.

मिरज :

पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गावर गेली दोन वर्षे बंद असलेल्या चार पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला निर्देश दिल्याने पुणे-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे, मिरज-कोल्हापूर, सांगली-कोल्हापूर या पॅसेंजर रेल्वे गाड्या आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे.

कोरोना साथीमुळे मार्च २०२० पासून रेल्वेने पॅसेंजर गाड्या बंद केल्या आहेत. सर्व एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात झाल्या आहेत. मात्र या गाड्यांतून प्रवासासाठी आरक्षित तिकीट आवश्यक असल्याने मिरजेतून कोल्हापूर, सातारा व पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत. यामुळे पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आता कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गावरील बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली आहे. 

आठवडाभरात मिरज व कोल्हापुरातून चार पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीIndian Railwayभारतीय रेल्वेkolhapurकोल्हापूर