शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणा उत्पादन ५0 टक्के घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:44 PM

जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणा उत्पादन ५0 टक्के घटणारबहुतांश द्राक्षबागांचे उत्पन्न निम्म्यावर

तासगाव : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे सांगली जिल्ह्यात सुमारे ६० हजार एकर द्राक्षबागांना फटका बसला आहे. खरीप छाटणीपासून पीक छाटणीपर्यंत एकरी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च करूनदेखील पावसामुळे द्राक्षबागा सोडून देण्याची वेळ आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.गेल्या आठवडाभरात पावसाने कधी नव्हे एवढे जिल्ह्याला झोडपून काढले. दुष्काळी पट्ट्यातही मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला. सुरुवातीला द्राक्षबागा जगवण्यासाठी हजारो रुपयांची औषध फवारणी करूनदेखील पावसाने पिच्छा सोडला नाही. त्यामुळे शेतकरीच हतबल झाला.

जिल्ह्यातील सुमारे ६० एकर द्राक्षबागांची पीक छाटणी झाली आहे. त्यातील बहुतांश द्राक्षबागांना मोठा फटका बसला. दावण्यासारख्या रोगांनी द्राक्षघड खराब झाले. सततच्या पावसाने मणीगळ, घडकुजीसारख्या संकटांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक द्राक्षबागायतदारांनी बागा सोडून दिल्या आहेत.

औषध फवारणी करून मोठ्या जिद्दीने द्राक्षे टिकवून ठेवण्यासाठी अद्यापही काही द्राक्षबागायतदारांची केविलवाणी धडपड सुरु आहे. मात्र पावसाने झालेल्या नुकसानीचा फटका उत्पन्नाला बसणार असल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश द्राक्षबागांचे उत्पन्न निम्म्यावर येणार आहे. त्यामुळे द्राक्षबागांना हजारो कोटींचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. नुकसानीमुळे यंदा द्राक्षे आणि बेदाण्याच्या उत्पादनातही घट होणार आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीSangliसांगली