शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात गाळेधारकांचा बळी--कुशवाह यांना साकडे

By admin | Updated: November 16, 2014 23:50 IST

विट्यातील स्थिती : व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ : अनामत भरूनही गाळे सील

दिलीप मोहिते --विटा --विटा नगरपरिषदेने शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई परिसरात नव्याने बांधलेल्या शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळे सध्या सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत सापडल्याने गाळेधारकांचा नाहक बळी गेला आहे. गेल्या ५० वर्षांपासूनच्या जुन्या खोकीधारकांनी पालिका प्रशासनाला योग्य ते सहकार्य करून दुकाने काढून घेतली. आता नव्या इमारतीतील गाळ्यांची पालिकेने सांगितलेली अनामत रक्कम भरूनही राजकीय वादामुळे ही न्यायप्रविष्ट बाब झाल्याने गाळे सील करावे लागले. त्यामुळे गाळेधारकांसह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.विटा येथील शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून लाकडी खोकी होती. त्या खोक्यात व्यापारी व्यवसाय करीत होते. कालांतराने शहराच्या मुख्य चौकातच पालिकेने नवीन शॉपिंग सेंटर उभारून त्यात खोकीधारकांना प्राधान्याने गाळे वाटप करण्याचे अभिवचन दिले. त्यामुळे खोकीधारकांनी स्वखर्चाने आपली दुकाने काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य केले. दोन-तीन वर्षात याठिकाणी टोलेजंग व्यापारी संकुल उभारले. संकुलात जुन्या खोकीधारकांना प्राधान्याने गाळे वाटप करण्याचा शब्द पाळण्याचे ठरविले.त्यानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे अनामत रक्कम जमा करून घेऊन ३१ खोकीधारकांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, तेथूनच राजकीय वादाला सुरूवात झाली. विरोधी नगरसेवक, नागरी हक्क संघटना व सत्ताधारी यांचा राजकीय संघर्ष पुणे आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला.त्यात नागरी हक्क संघटना व विरोधी नगरसेवकांनी गाळेवाटप प्रक्रियेला स्थगिती मिळविली. त्यामुळे अनामत रकमा भरून घेऊन जुन्या खोकीधारकांना प्राधान्याने वाटप झालेले गाळे सील करण्यात आले. विरोधकांना आनंद झाला पण, व्यापाऱ्यांची दुकाने सील होऊन त्यांची रोजीरोटी बंद झाल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. विटा शहरात सध्या विरोधक, सत्ताधारी व आता गेल्या वर्ष-दीड वर्षापासून जन्माला आलेल्या नागरी हक्क संघटना पालिकेच्या राजकीय पटलावर चांगलीच तापली आहे. त्यांच्यातील राजकीय साठमारी व वादात मात्र व्यापाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. पालिकेने सांगितलेली वाढीव अनामत रक्कम भरूनही आमचे गाळे सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत सीलबंद झाले आहेत. त्यामुळे आम्हा व्यापाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यात गाळेधारक व्यापाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे यातून योग्य तो तोडगा काढून आम्हा व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून त्या जागेवर व्यवसाय करणारे जुने व्यापारी संपत कांबळे, किरण भिंगारदेवे, धोंडिराम पवार, सुरेश शिंगे, अमोल आहुजा, शंकर सीताराम सकट, शिवराम पवार व सुशिला कोरडे या नऊ व्यापाऱ्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला आहे.